• Thu. Sep 10th, 2026

Devendra Fadnavis: पीकसर्वेक्षण त्वरित करा; पावसाची तूट असलेल्या भागांत पंचनामे, 12 तास वीज देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

Devendra Fadnavis: राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यातील पाऊस, पिकांची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : राज्यातील काही भागांत पावसाने दीर्घ काळ खंड दिल्याने पिके धोक्यात आली आहेत. विदर्भात पावसाची तूट ३५ टक्क्यांवर गेली असून, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाचे प्रमाण कमी आहे. या पार्श्वभूमीवर पावसाची मोठी तूट असलेल्या भागांत पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिला आहे. ‘पिके वाचविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था करण्याबरोबरच नुकसान झालेल्या पिकांना पंचनाम्याच्या आधारे मदत देण्याची कार्यवाही करावी,’ अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर माध्यमांना याबाबत माहिती दिली. ‘पावसाने खंड दिल्यामुळे अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाला असून, उभ्या पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाची मोठी तूट असलेल्या भागांची स्वतंत्र पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणातून पिकांची नेमकी स्थिती स्पष्ट झाल्यानंतर नुकसान झालेल्या भागात मदतीची कार्यवाही केली जाणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesUddhav Thackeray: पक्षचिन्हाचा गैरवापर नको, धनुष्यबाण चिन्ह तात्पुरते गोठवण्याची उद्धव ठाकरेंची मागणीपिकांना पाणी देता यावे, यासाठी दररोज १२ तास वीजसेवा देण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. वीजपुरवठ्यात अडथळा ठरणारे जळालेले रोहित्र तातडीने बदलून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे. ‘पावसाअभावी पिके वाचविणे शक्य असलेल्या भागांत सिंचनाचे नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले असल्यास सर्वेक्षण आणि पंचनाम्यांच्या आधारे नुकसानभरपाईची कार्यवाही केली जाईल,’ असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesKurla Ganesh Murti : बाप्पाच्या आगमनादरम्यान 15 फुटी गणेश मूर्ती कोसळली, कुर्ला येथील घटना, दोन जखमीउपलब्ध पाण्याचा वर्षभरासाठी आराखडा
पावसाच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचा आदेशही दिला आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलसाठ्यांमध्ये किती पाणी आहे आणि त्याचा पुढील वर्षभरात कोणत्या पद्धतीने वापर करता येईल, याचे नियोजन करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पाऊस पुन्हा सुरू होऊन तूट भरून निघाल्यास परिस्थिती सुधारू शकते. मात्र, पावसाची स्थिती प्रतिकूल राहिल्यास उपलब्ध पाणी, सिंचन आणि पीकनुकसान यांचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा