• Thu. Sep 10th, 2026

Shivsena Symbol Row: ‘एमपीएससी’च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे. त्यासाठी आमचा न्यायालयीन लढा सुरू आहे. मात्र, निकालाला विलंब होत असेल तर संबंधित चिन्हाचा गैरवापर होऊ नये म्हणून ते गोठवण्याचा पर्याय न्यायालयात मांडण्यात आला आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा कथित गैरवापर करून त्यांनी सत्ता मिळवली आणि त्यानंतर त्याचा गैरवापर झाला, अशी टीकाही त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना डीजेचा वापर, एमपीएससी परीक्षांतील गोंधळ, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली.

Maharashtra TimesKurla Ganesh Murti : बाप्पाच्या आगमनादरम्यान 15 फुटी गणेश मूर्ती कोसळली, कुर्ला येथील घटना, दोन जखमीउत्सव हे नागरिकांच्या आनंदासाठी असावेत. त्यातून नागरिकांना त्रास होता कामा नये. दणदणाटापेक्षा आरती, झांज आणि घंटानाद यांसारख्या पारंपरिक पद्धतींमध्येही उत्सवाचा आनंद मिळतो. त्यामुळे मोठ्या आवाजातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न करत ठाकरे यांनी ‘डीजे’बंदीबाबत बैठक घेऊन महाराष्ट्रासाठी एकसमान धोरण ठरवण्याची मागणी केली.

नगरसेवकांवर एकतर्फी कारवाई

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर होत असलेल्या कारवाईवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रकरणांमध्ये वेगाने निर्णय होत असतील तर अन्य पक्षांच्या नगरसेवकांवरील आक्षेपांच्या प्रकरणांमध्येही त्याच पद्धतीने निर्णय व्हायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली. निवडणुकीसाठी वापरलेली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे एकाच व्यवस्थेतून मिळालेली असताना एका पक्षाच्या नगरसेवकांवरच वेगाने कारवाई होत असेल, तर ती एकतर्फी कारवाई असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.

Maharashtra TimesGaneshotsav Toll Free : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा, स्वतंत्र पासची व्यवस्थाफोटो वेगवेगळ्या भिंतींवर लावा

पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर जे कोणी बसतील त्यांच्यासाठी राजशिष्टाचाराचा विषय असतो. आजपर्यंत अनेक जण बसून गेले आहेत. त्यावर आपले पंतप्रधान बसले आहेत. भविष्यात दुसरे कोणी बसणार आहेत. त्यामुळे राजशिष्टाचार आणि दैवतांचा फोटो वेगळा असला पाहिजे. दैवत कोणी बदलू शकत नाही. राजशिष्टाचाराप्रमाणे माणसे बदलू शकतात. पद मिळवण्यासाठी माणसे पक्ष बदलू शकतात. आम्ही दैवत बदलू शकत नाही. त्यामुळे दैवतांच्या बरोबर राजशिष्ठाचाराची मागणी नसावी. तुम्ही वेगळी भिंत ठेवा. सरकारी भिंतीवर सरकारी माणसे पाहिजेत, असे ते म्हणाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा