• Thu. Sep 10th, 2026

Global Fintech Fest 2026: महाराष्ट्र देशातील पहिलं ‘टोकनाइज्ड’ राज्य बनणार; ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा

Global Fintech Fest 2026: महाराष्ट्रासह देशाची अर्थव्यवस्था सर्वाधिक विश्वासार्ह आणि लवचीक अर्थव्यवस्था म्हणून उदयास यावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : महाराष्ट्रात जमिनीच्या नोंदी अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी त्यांच्या टोकनायझेशनची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र देशातील पहिले ‘टोकनाइज्ड राज्य’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६च्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

जमिनीच्या नोंदींचे टोकनायझेशन करण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र डिजिटायझेशन अँड एक्स्चेंज ऑफ लँड टोकन ॲसेट’ अर्थात ‘डेल्टा’ कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्याद्वारे जमीन आणि स्थावर मालमत्तेच्या ब्लॉकचेन आधारित टोकनायझेशनसाठी देशातील पहिली कायदेशीर चौकट निर्माण करण्याचा उद्देश आहे. ‘आम्हीडेल्टा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे’, असे फडणवीस यांनी सांगितले.

Maharashtra TimesRohan Parekh : रोहन पारेख PMO मध्ये जॉब लागल्याचं समजून काम करत होता; मोदींच्या BKC तील कार्यक्रमाआधी सुरक्षाभेद, वकिलांच्या दाव्यामुळे ट्विस्टराज्यात जमीन आणि स्थावर मालमत्तेत कोट्यवधी रुपयांचे भांडवल अडकून राहिले आहे. हे निष्क्रिय भांडवल सक्रिय करता येईल का, याचा विचार करणे आवश्यक आहे. अनेकांकडे मोठ्या प्रमाणावर जमीन आहे; मात्र कामकाजासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध नसते. अशा पार्श्वभूमीवर डेल्टा कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध वित्तसंस्था यांच्यात समन्वय आवश्यक असेल, असे फडणवीस म्हणाले.

नवीन तंत्रज्ञान, एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि आभासी पेमेंटच्या विविध पद्धतींमुळे डिजिटल पेमेंटला मोठी चालना मिळत आहे. मात्र, कोणतेही तंत्रज्ञान यशस्वी होण्यासाठी विश्वासाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे.

Manoj Jarange उपोषण हे फेक नरेटीव्ह, ED चौकशी करा, माजी सहकारी बारस्करांचा घणाघात

उद्योजकांनी महाराष्ट्राकडे प्रयोगशाळा म्हणून पाहावे. फिनटेक उद्योगांसाठी महाराष्ट्र प्राथमिक मंच म्हणून साह्यभूत ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानासोबत भागीदारी आणि विविध पर्यायांची चाचपणी पुढील काळात महत्त्वाची ठरणार असल्याचे या सत्राचे प्रास्ताविक करताना ‘एनपीसीआय’च्या सोहिनी रजोला यांनी सांगितले.

मुंबई ही देशाची आर्थिक तसेच फिनटेक राजधानी आहे, तर भारत जगातील सर्वांत मोठी डिजिटल व्यवहार बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. ‘यूपीआय’ प्रणाली ही खऱ्या अर्थाने वास्तविक फिनटेक असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना वित्तीय सल्ला मराठीतून मिळण्याची सुविधा निर्माण व्हायला हवी. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईल, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा