नाशिकच्या इंदिरानगर सुदर्शन कॉलनी परिसरात मुख्य रस्त्याला भलंमोठं भगदाड पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणती दुर्घटना घडली नाही. पण रस्त्यावरील भगदाडचा फोटो अंगावर काटा आणणारा आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिक शहर सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन पुन्हा चर्चेत आलं आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत अनेकांचा जीव गेला आहे. तसेच दोन आठवड्यांपूर्वी नाशिकच्या नवश्या गणपती परिसरात रस्ता खचल्याची घटना समोर आली होती. या घटनेत ट्रक थेट खचलेल्या रस्त्यात अडकला होता. ही घटना ताजी असताना आता अशीच काहीशी घटना समोर आली आहे. नाशिकच्या इंदिरानगर-सुदर्शन कॉलनी येथे मुख्य रस्त्याला मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.
इंदिरानगरमधील सुदर्शन कॉलनीत रस्त्यांची दुरावस्था काय आहे ते आता उघडपणे समोर आलं आहे. मुख्य रस्त्यावर भलंमोठं भगदाड पडलं आहे. या भगदाड पडलेल्या ठिकाणी खोल खड्डा दिसत आहे. या भगदाड पडलेल्या ठिकाणी एखादी गाडी गेली असती तर ती थेट काही फूट खाली गेली असती. सुदैवाने तसं घडलं नाही. असं असलं तरी रात्रीच्या वेळी भगदाड स्पष्ट दिसत नसल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
Palghar Case : ‘तुमच्या हलगर्जीपणामुळेच नऊ आरोपी फरार’, मुंबई हायकोर्टाचे पालघर पोलिसांवर ताशेरेविशेष म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली आहे तिथून अवघ्या 200 ते 300 मीटरवर रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याची ही अवस्था झाल्यानंतर प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करुन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
शिवेना उबाठाचे गटनेता आक्रमक
या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक महापालिकेतील गटनेता केशव पोरजे यांनी भूमिका मांडली आहे. “दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी चॅलेंज दिले होते की खराब रस्ते दाखवा. निकृष्ट दर्जाचे काम आढळले तर मी नाव बदलेन. सुदर्शन कॉलनी येथे रस्त्याला मोठे भागदाड पडले आहे. सांगायला वाईट वाटते की एक आयएएस अधिकारी राजकारण्यांसारखं चॅलेंज करतात हे चॅलेंज करणे काम आमचे आहे राजकारणी लोकांचे”, असं केशव पोरजे म्हणाले.
Manoj Jarange Patil : एका फटक्यात संपाल, मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा“आम्ही महापालिका आयुक्तांचे चॅलेंज स्वीकारले आहे. आम्ही लवकरच त्यांना कुठे-कुठे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे ते दाखवणार आहोत. त्यांना चॅलेंज करायचे होते तर जेव्हा रस्त्यांमुळे अनेक बळी गेले तेव्हा करायचे होते की मी आणखी बळी जाऊ देणार नाही. त्यांचे चॅलेंज आम्ही स्वीकारले आहे. त्यांची इच्छा जी आहे नाव बदलण्याचे त्यांचा नामकरण सोहळा आम्ही लवकरच महासभेत करू”, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेता केशव पोरजे यांनी मांडली आहे.
पालिका आयुक्त काय म्हणाल्या होत्या?
“नाशिक महापालिका आयुक्त म्हणून माझं एक ओपन चॅलेंज आहे, आमचे जेवढे टेंडर डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही ऑनलाइन वेबसाईटवर अपलोड करतोय. ज्यांना जे चेक करायचं आहे ते करा. आमची चूक काढून दाखवा. आम्ही बघू की आम्ही कुठे चुकलो आहोत. कारण आम्ही कुठेच चुकलो नाहीत. हे एक ओपन चॅलेंज मी सगळ्यांना केलं होतं. आता परत करतोय. कामामध्ये आम्ही कुठेही कमतरता ठेवलेली नाही. मी सर्वांना ओपन चॅलेंज देते. कुंभच्या कामात एक तरी चूक काढून दाखवा. मी माझं नाव बजलून टाकेन”, असं वक्तव्य नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी केलं होतं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा