अमृता फडणवीस नागपूर येथे आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. यावेळी त्यांना त्यांच्या गरब्यामध्ये मुस्लीम व्यक्तीस सहभागी होऊ द्यावे या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर अमृता फडणवीस यांनी भूमिका मांडली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी नवरात्रीत गरबाच्या कार्यक्रमांमध्ये कुणी इतर समाजाचा व्यक्ती सहभागी होण्यासाठी इच्छुक असेल तर त्याला सहभागी करुन घ्यावं, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचे अनेकांकडून स्वागत करण्यात आलं. तसेच त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत असताना त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. नागपुरात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“खूप छान वाटत आहे. मुन्ना यादव आणि लक्ष्मी यादव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आलेली आहे. इथे स्त्रियादेखील दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. स्त्रियादेखील मनोरा करणार आहेत. खूप छान वाटत आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. यावेळी अमृता फडणवीस यांना गरबामध्ये मुस्लीम समाजाच्या व्यक्तीला परवानगी देण्यास हरकत नसल्याच्या त्यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.
Manoj Jarange Patil : एका फटक्यात संपाल, मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
“तुम्ही मला कायम असे प्रश्न विचारुन, जी मंत्र्यांची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते त्याची उपाधी दिली आहे. मी खरंच सांगू इच्छित आहे. आपल्या धर्मात वेगवेगळे असे रंग आहेत. तुम्ही पाहिलं तर जगात सर्वात जास्त लोकं कोणता धर्म मानतात? तर ख्रिश्चन धर्म. ते लोकं आपल्या सर्व सणांमध्ये सगळ्या लोकांचा समावेश करतात. त्यांचे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन त्यांनी लोकांनादेखील सेलिब्रेट करायला लावले. ख्रिसमस लोकांनादेखील माहिती आहे. आपला इतका सुंदर सण आहे. दहीहंडी असेल, गरबा , नवरात्र असेल, कुणी श्रद्धेने येत असेल, काही त्रास देत नसेल, कुटुंबासोबत येत असेल, विश्वासाचा टिळा लावून येत असेल तर त्याला येऊ द्यावे, असे मला वाटते”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
लव्ह जिहादच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
“ही भूमिका पार्शली काही लोकांनी घेतली असेल काही तशी लव जिहाद यासारखी काही कारण असेल. पण याचा आपल्याला लाँग टर्म विचार करावा लागेल. तसे कायदे कठोर करावे लागतील. आपल्या मुलीला वेद, पुराण, महाभारत यांना माहित आहे का? स्वतःच्या धर्मावर त्यांचा विश्वास आहे का? त्यांना स्वतःचा धर्मावर गर्व आहे का? मग अशा केसेस कमी होतील किंवा हळूहळू या केसेस होणार नाहीत”, अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली.
Palghar Case : ‘तुमच्या हलगर्जीपणामुळेच नऊ आरोपी फरार’, मुंबई हायकोर्टाचे पालघर पोलिसांवर ताशेरे
दहीहंडीतील महिलांच्या नृत्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
“दहीहंडीचा उत्सव स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी मनोरा लावून होतो आहे. एक बॅलन्स साधला जातोय. मात्र काही ठिकाणी पुरुष मनोरा बनवतात तर दुसरीकडे महिलांना डान्स करायला लावतात. ते पण वेगवेगळ्या प्रकारचे नाच असतात. स्त्री-पुरुष समानता ठेवा. तुम्ही स्त्री आणि पुरुष पबमध्ये जातात तेव्हा दोघे नाचता ना? इथे मनोरा बनवता तेव्हा सगळे मनोरा बनवा. गरबा खेळता तेव्हा सगळे गरबा खेळतात. तसेच दोघे मनोराच बनवा”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा