• Thu. Jun 18th, 2026
    Rohit Pawar: काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात; गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका

    म.टा.वृत्तसेवा, सटाणा: ‘इंधन टंचाई निर्माण झालेली असताना सरकारने ती नियंत्रणात आणण्याऐवजी शेतकऱ्यांवर आरोप करण्याचे काम सुरू केले आहे. काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात’, अशी टीक आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (दि. २५) सटाण्यात केली.

    शेतीची मशागत, पाणीपुरवठा, ट्रॅक्टर व पंपासाठी इंधन अत्यावश्यक असताना रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनाच दोष देणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या ‘शेतकरी पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार करीत आहेत’ या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.

    पंपांवर लागलेल्या लांबलचक रांगा, तासनतास प्रतीक्षा, तसेच कृषी कामांसाठी डिझेल न मिळाल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. वाहनचालक, व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांनी इंधन पुरवठ्यातील विस्कळीतपणा आणि त्याचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम अधोरेखित केला.

    रोहित पवार यांनी पेट्रोल पंपचालक दीपक रुंदाळ यांच्याकडून व्यवस्थापनाची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून देणे, पुरवठा तातडीने सुरळीत करणे आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, अशी मागणी त्यांनी केली.

    Nashik Politics: नाशिकच्या जागेवरुन भाजप-शिवसेनेचे जुळेना सूत; इच्छुकांच्या मुंबई-जळगावला वाऱ्या
    सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात टंचाईमुळे वाहतूक, शेती आणि व्यापारी व्यवहारांवर परिणाम होत असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, तालुका अध्यक्ष केशव मांडवडे, भारत कटके, मनोज सोनवणे, दिनेश सोनवणे, जनार्दन सोनवणे उपस्थित होते.

    कांदा खरेदी दरात केंद्राकडून वाढ
    लासलगावसह नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या घसरलेल्या दराविरोधात शेतकरी आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने रब्बी कांदा २०२६ साठी किमान आश्वासित खरेदी किंमत जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मंगळवारपासून (दि. २६) प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर लागू राहणार असल्याचे आदेश केंद्र सरकारच्या कॉस्टिंग सेलमार्फत जारी करण्यात आले आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed