• Sun. Apr 13th, 2025 4:05:09 PM

    ‘किडन्या घ्या अन् आम्हाला कर्जमुक्त करा’, पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यानं अवयव विक्रीला काढले

    ‘किडन्या घ्या अन् आम्हाला कर्जमुक्त करा’,  पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यानं अवयव विक्रीला काढले

    वाशिमच्या अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यानं पिककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः सह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर शरीराचे अवयव विकायला काढले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    वाशिम: वाशिमच्या (Washim) अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यानं (Farmer) पिककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः सह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर शरीराचे अवयव विकायला काढले आहेत. इढोळे आज अव्यवाचे दर लिहलेले फलक अंगावर लावून वाशिमच्या मुख्य बाजारात उभे होते. दरम्यान ‘सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जमाफी शक्य नसून शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा असं वक्तव्य केलं आहे. मात्र या शेतकऱ्याकडं विकण्यासाठी कोणताही शेतमाल शिल्लक नसल्यानं कर्जाची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने स्वतःसह बायको आणि मुलांचे अवयव विक्रीसाठी काढली आहे’ शेतकऱ्याने सांगितल आहे.

    सातबारा कोरा करू अस म्हटलं २८ तारखेला सांगितलं कर्ज भरा
    वाशिमच्या मुख्य बाजारात किडनी आणि इतर अवयव विक्रीसाठी आले असता सतीश इढोळेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी आज वाशिम येथील सर्वात मोठ्या मार्केटमध्ये माझ्या किडन्या घेऊन विकायला आलो आहे. कारण सांगितले होते की, सातबारा कोरा करू आणि २८ तारखेला सांगितले की कर्ज भरा. कर्ज भरणार कसं? माझ्या किडनीची किंमत ६० हजार रुपये ठेवली आहे. माझ्या पत्नीच्या किडनीची किंमत ४० हजार रुपये ठेवली आहे आणि माझ्या मोठ्या मुलाच्या किडणीची किंमत २० हजार रुपये ठेवली आहे आणि लहान मुलाच्या किडनीची किंमत ही १० हजार रुपये ठेवली आहे. या किडन्या घ्या आणि आमच्या डोक्यावरच्या कर्जातून मुक्त करा. हेच सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत.

    किडनी विकायची वेळ का आली?
    किडनी विकायची वेळ का आली या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शेतमालाला भाव नाही. सरकारने सोयाबीन ३ हजारांना विकली. सरकारने सांगितले कर्जमाफ करू त्या भरवश्यावर आम्ही बसलो. सरकारने आश्वासन दिले आणि सरकारने शेतकऱ्यांना फसवलं. पण शेतकऱ्याचा तळतळाट या सरकारला असा लागेल की यांचं सरकार पलटी होईल. शेतमालाच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सोयाबिनला भाव नाही. शेतकऱ्याने विकावं काय हेच कळतं नाही. बियाणे महाग आहे. खत महाग आहे. पुढची पेरणी आम्ही करू शकत नाही. सरकारमुळे ही आमची दशा झाली आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed