या रुग्णांमध्ये कृष्णा भांगरे,सखुबाई कोंडार ,द्रौपदाबाई कोंडार ,सुलबाई कोंडार ,नीता अशोक कोंडार ,गणेश मोहधुळे,समीर भांगरे ,कोमल भांगरे, विठाबाई भांगरे,वैष्णवी दाभाडे ,मीराबाई भांगरे,सुमनबाई कोंडार, तान्हुबाई भांगरे ,देवकाबाई भांगरे,सीताराम म्हशाल,मनीषा भांगरे,सविता कडाळी ,मीराबाई भांगरे,अलका भांगरे ,अशोक सुरकुले ,सयाजी कवटे,समीर भांगरे,सोमा कोंडार असे एकूण २६रुग्ण राजूर रुग्णालयात तर कोहणे ग्रामीण रुग्णालयात १६ तर खिरविरे येथे १२ रुग्ण दाखल असून ५४ रुग्णांना दाखल करण्यात आले असून २० रुग्णांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्हा आरोग्य अधिकारी,सिव्हिल सर्जन यांना माजी आमदार वैभव पिचड यांनी संपर्क करून रुग्णाची माहिती देऊन उपचारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News
करवंदरा येथे काल रात्री हळदीचा कार्यक्रम असल्याने सोमा दगडू भांगरे यांचे घरी २०० ग्रामस्थ जेवणासाठी गेले असताना डाळ भात, भाजी, गोड असे पदार्थ खाल्ले. मात्र, त्यांना सकाळपासून उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यापैकी २७ लोक पडोशी येथे पोहचले त्यांनी त्रास झाल्याने त्यांनी खिरविरे,समशेरपूर येथे उपचार घेतले. कोहणे राजूर येथे ३८ रुग्ण उपचार घेत आहेत.
गंभीर असणाऱ्या रुग्णांना तातडीने नाशिक,संगमनेर,लोणी येथे तर काही रुग्नांची खासगी रुग्णालयात सोय करण्यात आली आहे. डॉ.रामनाथ दिघे,(ग्रामीण रुग्णालय राजूर)राजूर रुग्णालयात लहान मोठे,वृद्ध,महिला असे २६ रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अन्नातून विषबाधा झाली असून त्यामुळे काही रुग्ण गंभीर असून त्यांना नाशिक ,संगमनेर येथे हलविण्यात आले आहे. नाशिक येथे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे या रुग्णालयात रुगणांसोबत पोहोचल्या आहेत.