काय आहेत कारणं?
राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाला बसलेला धक्का, अशोक चव्हाण यांच्या पक्षत्यागाच्या पार्श्वभूमीवर नव्याने चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून पदाधिकाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला.
डावलल्याची भावना
प्रदेश काँग्रेसकडून सातत्याने नियुक्त्या केल्या जात आहेत. मात्र, जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. ३-४ दशकांपासून पक्षासाठी झटणाऱ्यांची दखल घेतली जात नाही. मानसन्मान तर दूर साधी विचारपूस केली जात नाही. संसदीय मंडळ, विधानसभा मतदारसंघातील काही नावांवरून नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला. जुने, निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना महत्त्वाची पदे, जबाबदारी देणे, संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरात सचिवांना डावलने, असा असंतोष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
भाजपसह अन्य पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सरसावले असताना काँग्रेसमध्ये मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात परत मोर्चेबांधणी सुरू झाली. दरम्यान, असंतुष्टांचा एक गट बुधवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.