• Sat. Mar 7th, 2026
    Monsoon 2023: दुष्काळाचे सावट गडद, वाळलेला चारा संपला, पाण्यासाठीही मागवले टँकर; बळीराजा संकटात

    अहमदनगर : ऑगस्ट महिना संपत आला; तरीही नगर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरीच्या ४४ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले असून, पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. जिल्ह्यात सध्या ५५ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. जनावरांच्या चाऱ्याची मोठी अडचण झाली असून, वाळलेला चारा आता संपला आहे. पाऊस उशिरा आल्याने हिरवा चाराही पुरेसा उपलब्ध झालेला नाही. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस झाला नाही, तर यावर्षी तीव्र दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.

    जुलै महिन्यात अनेक ठिकाणी जास्त पाऊस झाला. मात्र, बरेच जिल्हे कोरडेच आहेत. ऑगस्ट महिन्यात बहुतांश ठिकाणी पावसाने दडी मारली. ज्या भागात आधी पाऊस झाला नाही, तेथे आता दुष्काळाचे सावट आहे. या भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाऊस झाल्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असला, तरी नवीन चारा येण्यास वेळ लागतो.

    कात्रज चौकातील वाहतूक कोंडी जैसे थे; दीड वर्षात फक्त खांबच उभे, पूल वेळेत होणार का? पुणेकरांचा प्रश्न
    दूध उत्पादनात घट

    नगर जिल्हा दूध उत्पादनासाठी ओळखला जातो. जिल्ह्यात १३ लाख ७८ हजार दुभती; तसेच दोन लाख २१ हजार इतर अशी १५ लाख ९९ हजार जनावरे आहेत. गेल्या वर्षीचा चारा संपत आल्याने पशुपालकांसमोर मोठे संकट निर्माण होणार आहे. याचा दूध उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने चारा वाहतुकीला जिल्हाबंदी केली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामातील चारा जुलैअखेरच संपला आहे. ज्या भागात लवकर पाऊस झाला, तेथे नवी चारा पिके येऊन काही प्रमाणात चारा उपलब्ध झाला. बहुतांश भागातील वाळलेला चारा (वैरण) संपला आहे, तर नवा हिरवा चाराही आलेला नाही. खरीप हंगामात ज्वारीच्या पेरण्या न झाल्याने पुढील वर्षीसाठीचा वाळलेला चारा उपलब्ध होण्याचे प्रमाणही घटणार आहे. गेल्या वर्षी पिकलेला चारा आतापर्यंत कसाबसा पुरला. आता चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

    सरकार चारा पुरविणार

    नगरसह काही जिल्ह्यांत जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला आहे, तेथे शेतकऱ्यांनी पिकविलेला चारा सरकारतर्फे खरेदी करून अन्य भागांत पुरविण्यात येणार आहे. चारा वाहतुकीला जिल्हाबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मात्र, चाऱ्यासाठी इतर पर्याय उपलब्ध न झाल्यास उसाचा चारा म्हणून उपयोग केला जातो. त्यामुळे उसाचे क्षेत्र घटून साखर उत्पादनही घटते.

    पाणी टंचाईचेही संकट

    नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाला आहे; तरीही अन्य बंधारे आणि विहिरींमध्ये पाणी नाही. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात ५५ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्याची वेळ आली आहे. आता शेवटच्या टप्प्यातही पाऊस झाला नाही, तर मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याची टांगती तलवारही नगरवर राहणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटल्याने टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

    Mumbai Ganeshotsav: ११ स्थानकांसाठी ३५ तात्पुरते थांबे; एसटीच्या उत्सव विशेष गाड्यांसाठी नियोजन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed