• Sat. Mar 14th, 2026
    तरुण शेतकऱ्याची कमाल! कृषी पदवीनंतर शेतीच्या ओढीमुळे भाजीपाल्याची लागवड, आता घेतोय लाखोंचे उत्पन्न

    सिंधुदुर्ग: कोकणात प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस अशा हंगामी पिके घेतली जातात. त्यामुळे इतर लागवडीकडे फारसा शेतकरी लक्ष देत नाही. एवढंच नाही तर नेहमीच्या आहारात लागणारा भाजीपाला सुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या मार्केटयाड येथून कोकणात येतो. पण कोकणातला शेतकरी निसर्गाच्या लहरी वातावरणामुळे आणि आर्थिक दृष्ट्या नुकसान होईल, अशा भीतीपोटी भाजीपाला करण्याचा धोका पत्करत नाही. पण मात्र कोकणातील एक धाडशी तरुण शेतकऱ्यांने गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी पाल्याची लागवड केली आहे.
    इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी; परदेशात १६ वर्षे नोकरी, गावच्या ओढीमुळे मायदेशी परतला अन्…
    सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील सिद्धी वारंग या तरुण शेतकऱ्यांने ४ एकर जागेमध्ये भाजीपाला केला आहे. सिद्धी वारंग या तरुण शेतकऱ्याने कृषी पदवीचे शिक्षण घेतले आहे. सिद्धी वारंग यांची वडिलोपार्जित शेती होती. त्याच शेतीची ओढ आपसूकच माझ्याकडे आली. गेली सात वर्षे भाजीपाला व्यवसाय सुरू आहे. पावसाळी हंगामात वारंग यांनी दोडकी, पडवळ, कारली अशा विविध प्रकारची भाज्यांची लागवड केली आहे. इतर हंगामात कलिंगड, भुईमूग, केळी, पपई, भोपळा देखील करतात. जवळपास ४ एकर क्षेत्रामध्ये वेल वर्गीय भाजी केली आहे. मुख्य पीक म्हणून दोडकी, पडवळ, कारली घेतली जातात. प्रत्येक हंगामात फेरबदल देखील करतो. वेल वर्गीय भाजीसाठी कायमस्वरूपी बनवला आहे. तसेच बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन वेगवेगळी भाजीपाल्याची पीके घेतली जातात.

    दोडकी, पडवळ, कारली हे ४ एकर क्षेत्रात होणारे उत्पादन जिल्ह्याच्या लोकल मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार दिले जाते. तसेच जिल्ह्याबाहेर कोल्हापूर येथे व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार पाठवले जाते. त्याचप्रमाणे सिध्दी वारंग यांची इच्छा आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तालुक्यातील तरुण शेतकरी अजून अशा प्रकारची लागवड करायला तयार व्हावेत. त्यामुळे मुबंईसारख्या मोठ्या मार्केटमध्ये भाजीपाला एकत्रितपणे जाऊ शकतो. एकत्रितपणे भाजीपाला घेऊन गेलो तर वाहतुकीच्या दृष्टीने परवडू शकत. सध्या लोकल मार्केटमध्ये दर नेहमी कमी जास्त होत असतो. त्यामुळे शाश्वत दर मिळत नाही. इतर मार्केटमध्ये ज्या पद्धतीचे दर असतात त्याच दराने भाजीपाला मार्केटमध्ये द्यावा लागतो.

    चांगला भाव आल्यानं टोमॅटोची लागवड केली, रात्रीत होत्याचं नव्हतं झालं

    कोकणात कुर्ली देवधर धरणामुळे नदीकाठच्या गावांना आर्थिक दृष्ट्या सुलभता आली आहे. नदीला वर्षाच्या बाराही महिने पाणी वाहत असल्याने नदीकाठची गाव भाजीपाला इतर शेतीकडे वळताना दिसत आहेत. पण आपण पाणी, फवारणी, मशागत, बियांनी याचे योग्य नियोजन केलं तर यश मिळत. तसेच निसर्गाच्या लहरी वातावरणावर मात करत त्यामुळे एकरी १५ टनपर्यत आपण भाजीपाला विकू शकतो. इतर खर्च वजा करून हंगामात ५ लाखांपर्यंत फायदा होतो. व्यापारी हे गेले अनेक वर्षांपासून भाजीपाला विविध प्रकाराचा वारंग यांच्याकडून घेऊन जातात. भाजीला चव उत्कृष्ट असते. वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करत असतात. आम्ही वारंग यांच्या शेतातून ताजी भाजी घेऊन जातो. कोकणात पडीक क्षेत्र अधिक आहे. पण मात्र कोकणातल्या तरुणांकडे इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. नोकरीच्या मागे न धावता अशा प्रकारच्या धंद्यामध्ये लक्ष घातलं तर यश शंभर टक्के मिळू शकतो, याचा उदाहरण हे सिद्धी वारंग यांचं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed