Raigad Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रायगड जिल्ह्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या टेम्पोमध्ये 15 कामगार होते.
नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून काम करणारे काही कामगार पिकअप टेम्पोतून प्रवास करत होते. रामराज–भिलजी मार्गावर वाहन जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो अचानक पलटी झाला. अपघात इतका अचानक झाला की वाहनातील कामगारांना स्वतःला सावरण्याचीही संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे 15 कामगार जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर येत आहे.
Dahanu-Nashik Railway: डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला वेग, पश्चिम घाटातून जाणार मार्ग; आदिवासी व ग्रामीण भागांचा विकास
एकाचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, अपघातग्रस्त सर्व कामगार हे गेल कंपनीमध्ये काम करणाऱ्या खासगी ठेकेदाराचे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनाचा वेग, रस्त्याची परिस्थिती किंवा चालकाचे नियंत्रण सुटणे यापैकी कोणत्या कारणामुळे हा अपघात घडला याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची मागणीही स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मृत व्यक्तीची ओळख आणि अपघाताची सविस्तर माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
Buldhana Crime : आधी मोबाईल हॅक केला, डेटा चोरुन महिलेला Video कॉलवर विवस्त्र केलं; शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी
प्रसूतीनंतर माऊलीचा करुण अंत
बाळाच्या जन्माचा आनंद क्षणात शोकात बदलणारी हृदयद्रावक घटना अलिबाग जिल्हा रुग्णालयात घडली. प्रसूतीनंतर प्रकृती बिघडल्याने एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून नवजात बाळ जिवंत राहिले असताना आईचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
