ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहावे की अजितदादांसोबत जावे, असा पेच निर्माण झाल्याने अनेकांच्या तोंडून थेट राजकारण सोडण्याचीच भाषा बोलली जाऊ लागली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या नगर जिल्ह्यातही अशीच अस्वस्थता आहे. कोणाकडे जायचे, हे ठरविताना आमदार आणि पदाधिकारी काही निकष लावत आहेत.