राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि नियमांमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी रोहित पवार यांचं पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.आंदोलनस्थळी जात खासदार निलेश लंकेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.