Jalgaon Farmer News: पाण्यामुळे केळीचे भक्कम खांब मुळासकट उखडून जमिनीवर कोसळले आहेत आणि त्यावरील तयार घड मातीत गाडले गेले आहेत.
नवरात्रात उपवासासाठी केळीला देशभरातून मोठी मागणी असते. जळगावची केळी देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत चवीसाठी प्रसिद्ध आहे. याच काळात चांगला दर मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत घेतली होती. मात्र, अतिवृष्टीने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. तालुक्यातील देवगावसह अनेक गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून शेतांमध्ये पाणी साचलेले आहे.
खरीप हंगामाचे दिवाळे! सिन्नर, बागलाण तालुक्यातील ५२ हजार शेतकऱ्यांची पिके बाधित
निर्यातीवरही संकट
जळगाव जिल्हा केळीच्या निर्यातीसाठी ओळखला जातो. मात्र, या नैसर्गिक संकटामुळे केळीच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यास निर्यातीवरही गदा येण्याची भीती आहे.
प्रशासकीय मदतीची प्रतीक्षा
दरवर्षी आस्मानी संकट शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेले असते. यावर्षी केळीच्या शेतात पाणी साचल्यामुळे आमची पुन्हा मोठी हानी झाली आहे. पण पंचनाम्यांसाठी अद्याप कुठलेही प्रशासकीय अधिकारी बांधावर फिरकलेले नाहीत, अशी खंतही संतोष पाटील यांनी बोलून दाखवली.
Nashik Crime : चिमण्याभाई जेलमधून सुटला, साथीदारांचा शस्त्र मिरवत धिंगाणा अन् रिलबाजी, पोलिसांनी बेड्याही ठोकल्या अन्…
शहरात १०५७.२ मिमी पाऊस
नाशिक शहरात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १०५७.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. परंतु, तो बेमोसमी पाऊस होता. जून ते सप्टेंबर या हंगामात म्हणजेच १२२ दिवसांमध्ये १०५७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. यंदा पावसाने शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था केली.

