• Sun. Jun 14th, 2026

    भरपाई द्या, अन्यथा गिरणेत उडी घेईन! केळीची बाग उद्ध्वस्त, दिव्यांग शेतकऱ्याला अश्रू अनावर

    भरपाई द्या, अन्यथा गिरणेत उडी घेईन! केळीची बाग उद्ध्वस्त, दिव्यांग शेतकऱ्याला अश्रू अनावर

    Jalgaon Farmer News: पाण्यामुळे केळीचे भक्कम खांब मुळासकट उखडून जमिनीवर कोसळले आहेत आणि त्यावरील तयार घड मातीत गाडले गेले आहेत.

    banana farm(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, जळगाव: केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यावर पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झाला आहे. अनेकांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या. यात सर्वस्व गमावलेल्या देवगाव येथील दिव्यांग केळी उत्पादक संतोष पाटील यांच्या वेदनांनी सर्वांना हेलावून सोडले आहे. ‘शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, तर मी गिरणा नदीपात्रात उडी घेऊन जीव देईन,’ अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

    नवरात्रात उपवासासाठी केळीला देशभरातून मोठी मागणी असते. जळगावची केळी देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत चवीसाठी प्रसिद्ध आहे. याच काळात चांगला दर मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत घेतली होती. मात्र, अतिवृष्टीने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. तालुक्यातील देवगावसह अनेक गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून शेतांमध्ये पाणी साचलेले आहे.
    Maharashtra Timesखरीप हंगामाचे दिवाळे! सिन्नर, बागलाण तालुक्यातील ५२ हजार शेतकऱ्यांची पिके बाधित
    निर्यातीवरही संकट
    जळगाव जिल्हा केळीच्या निर्यातीसाठी ओळखला जातो. मात्र, या नैसर्गिक संकटामुळे केळीच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यास निर्यातीवरही गदा येण्याची भीती आहे.

    प्रशासकीय मदतीची प्रतीक्षा
    दरवर्षी आस्मानी संकट शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेले असते. यावर्षी केळीच्या शेतात पाणी साचल्यामुळे आमची पुन्हा मोठी हानी झाली आहे. पण पंचनाम्यांसाठी अद्याप कुठलेही प्रशासकीय अधिकारी बांधावर फिरकलेले नाहीत, अशी खंतही संतोष पाटील यांनी बोलून दाखवली.
    Maharashtra TimesNashik Crime : चिमण्याभाई जेलमधून सुटला, साथीदारांचा शस्त्र मिरवत धिंगाणा अन् रिलबाजी, पोलिसांनी बेड्याही ठोकल्या अन्…
    शहरात १०५७.२ मिमी पाऊस
    नाशिक शहरात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १०५७.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. परंतु, तो बेमोसमी पाऊस होता. जून ते सप्टेंबर या हंगामात म्हणजेच १२२ दिवसांमध्ये १०५७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. यंदा पावसाने शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा