Yavatmal Electric Shock Death: गरबा उत्सवादरम्यान विजेचा धक्क्याने ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अंकुश हा वायरमन म्हणून काम करीत होता. गरबा उत्सवादरम्यान वायरिंगचे काम करीत असताना जनरेटरमधून येणाऱ्या कनेक्शनला हात लागताच त्याला करंट लागला. नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या कार्यक्रमासाठी तालुका क्रीडा विभाग, पोलिस प्रशासन व महावितरण यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हा सांस्कृतिक कार्यक्रम बेकायदेशीररित्या सुरू असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप होत आहे.
पूर ओसरल्यावर मोहटादेवीला जा, मावशीने नकार दिल्याचा राग, मायबापाविना वाढलेल्या लेकराने लिंबाच्या झाडावर आयुष्य संपवलं
या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी परवानगीशिवाय आयोजित कार्यक्रमात निष्पाप आदिवासी तरुणाचा बळी गेला. जबाबदार आयोजक, कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
ओला दुष्काळ ते आरक्षण, अनेक मुद्दे अन् दोन आठवडे? विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन गाजणार?
बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. देवीचे दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना रानडुक्कर आडवे आले. यामुळे दुचाकीला अपघात झाला. या अपघातात राम रमेश नांदणे (वय २५) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दीपक मारुती इंगळे (वय २३) आणि अभिजीत बाळू उर्फ प्रमोद म्हसाळ (वय २४) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना २८ सप्टेंबरच्या रात्री नऊच्या सुमारास इच्छापूर ते चिचखेड खुर्द मार्गावर घडली. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील हे तिघे तरुण दुचाकीने इच्छापूर येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. परत येत असताना चिचखेड खुर्दजवळ रस्ता ओलांडणाऱ्या रानडुकरावर त्यांची दुचाकी धडकली

