• Sun. Jun 14th, 2026
    महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर


    Marathi Live News: राज्यात यंदा एल-निनो परिस्थितीचा परिणाम जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत कठोर पावले उचलली आहेत. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत राज्यातील शहरी व ग्रामीण भागात अखंड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी धरणांमधील उपलब्ध जलसाठ्याला पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चारही जिल्ह्यांमध्ये १६ जूनपर्यंत उष्ण आणि दमट वातावरण कायम राहू शकते. त्यानंतर कदाचित मेघगर्जनेसह पावसाची नोंद होईल. मात्र हा पाऊस फार मोठ्या प्रमाणात नसेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed