Chandrashekhar Bawankule: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी स्पष्ट केले.
‘अजून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतील. तसेच, ज्या नेत्यांना भाजपसोबत काम करायचे आहे, तेदेखील येतील. पक्षप्रवेश सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक भाजपमध्ये येत आहेत,’ असे बावनकुळे छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमाशी बोलताना म्हणाले. ‘राज्यात आजपर्यंत भाजपचे एक कोटी १२ लाख प्राथमिक सदस्य झाले आहेत. २८ तारखेपर्यंत दीड कोटी सदस्यसंख्या; तसेच संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड असलेला हा पक्ष असेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एअरगनशी मस्ती, अशोक सराफ यांच्या इमारतीला गोळी धडकली, ओशिवऱ्यात काय घडलं?
देशमुख हत्या प्रकरणावरही बावनकुळे यांनी भाष्य केले. ‘बीड येथील संतोष देशमुख हत्याप्रकरण गंभीर आहे. यावरून भाजपबाबत चुकीचे मत तयार करण्याचा काहींचा प्रयत्न होता. आम्ही राज्याला ज्या विकासाच्या मार्गावरून नेत आहोत, त्यामध्येही अडथळा येत होता. नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात; पण मनभेद असता कामा नयेत. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनीच एकत्र येऊन काम करावे, यासाठी धस आणि मुंडे यांची भेट करण्यात आली. देशमुख यांच्या आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही,’ असे ते म्हणाले.
पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय? नाना पटोलेंचा सवाल; कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘राज्यासाठी चांगले वाळूधोरण येत आहे. आमची अंतिम बैठक पुढच्या आठवड्यात होणार असून, त्यामध्ये हे धोरण निश्चित होईल. सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात वाळू मिळेल. यामुळे वाळूमाफिया यापुढे तयारच होणार नाहीत,’ असे बावनकुळे म्हणाले.
तुमच्याकडे परिवारवाद, तर आमचा महाराष्ट्रवाद! एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतून ठाकरेंवर टीका
‘धस-मुंडेंमध्ये तडजोड नाही’
भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची लपून-छपून कोणतीही चर्चा झाली नाही. दोघांत केवळ मतभेदांवर चर्चा झाली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, यावर आम्ही ठाम आहोत. दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. माझ्यासमोर धस यांनी कुठलीही तडजोडीची भूमिका घेतली नाही, असा खुलासा बावनकुळे यांनी केला. ही भेट होवून २७-२८ दिवस होऊन गेले आहेत. दोघांची माझ्यासमोरच चर्चा झाली. त्यात देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे असे दोघांचेही मत आहे. दोघांत मनभेद नसून मतभेद आहेत. एकमेकांना भेटण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. माझ्यासमोर दोघांमध्ये कोणतेही ‘कॉम्प्रमाइज’ झाले नाही, असा खुलासा बावनकुळे यांनी केला. हा षडयंत्राचाही भाग नसल्याचे ते म्हणाले.

