दिल्लीतील जंतर मंतर परिसरात होणाऱ्या सीजेपी आंदोलनाबाबत भाजप मंत्री नितेश राणे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींना देशाची सर्वाधिक काळजी आहे, असे म्हणत राणेंनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या राजकीय ऊंचीप्रमाणे बोलावं, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर देशविरोधी नारे देणारे विद्यार्थी असूच शकत नाही, असा हल्लाबोल राणेंनी केला.