मंचर येथे उद्या, मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे.
आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शहा यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र ज्यावेळी २००४ चा निवडणुकीत आढळराव पाटील यांना खेड मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावेळी आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २००४ साली मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले होते.
त्यानंतर आता तब्बल २० वर्षानंतर आढळराव पाटील हे स्वगृही परतत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेचे राजकारण देखील बदलल्याचे पहायला मिळणार आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
२०१९ मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणारी निवडणूक अस्तित्व दाखवणारी आहे. शिरूर लोकसभेत अनेकांचे अस्तित्व पणाला लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.