• Sat. Sep 21st, 2024
नांदेडमधील अशा गावाची गोष्ट महाराष्ट्रात असूनही नकाशावर नाही.. शेती असूनही साताबारा मिळेना

नांदेड: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. तर, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६३ वर्ष झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील असं एक गाव आहे, जे की इतक्या वर्षानंतरही महाराष्ट्रात असून ही त्याची राज्याच्या नकाशावर नाव नाही. नकाशावर गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाहीत. जिल्हातील किनवट तालुक्यातील वाघदरी असं या गावाचं नाव आहे.

किनवट तालुक्यातील वाघदरी हे २५० लोकांची वस्तीच गाव आहे. तेलगंणा सीमेवर लागून असलेल्या महाराष्ट्राच्या हद्दीतील हे गाव आहे. गावातील आजू बाजूला जंगल आहे. प्रांतवार रचनेनंतर हे गाव आंध्रप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात आले. पण हे गाव आज ही महाराष्ट्राच्या नकाशावर आले नाही. कुठल्याच शासकीय योजनेचा या गावातील नागरिकांना मिळत नाही. सात किलोमीटर पायपीट करुन आणि जीव मुठीत घेऊन गावकऱ्यांना जंगलातून प्रवास करावा लागतो. रस्त्याअभावी गावापर्यंत कोणतेच वाहन गावात जात नसल्याने अनेक अडचणीचा सामना गावाकऱ्यांना करावा लागत आहे.
माणुसकीचे दर्शन! सोन्यासह पैशांची बॅग महिला फुटपाथवर विसरली; मात्र वाटसरूच्या इमानदारीने जिंकलं सर्वांच मनं
या गावकऱ्यांकडे जवळपास साडे चार हजार हेक्टर शेतजमीन आहे, पण महसूली नोंदच नसल्याने कोणाकडे ही जमिनीचा सात बारा नाही. सातबारा नसल्याने पीकविमा, अनुदान अशा कुठल्याही योजनेचा फायदा येथील शेतकऱ्यांना मिळत नाही. जात प्रमाणपत्र आणि वन हक्क जमीन पट्टे नाहीत. गावकऱ्याकडे केवळ मतदान कार्ड , रेशन कार्ड , आधार कार्ड आहे त्यानुसार हे गावकरी महाराष्ट्रतील असले तरी गावाची महसुली नोंद नसल्याने त्याचं गाव मात्र नकाशावर नाही. गावाची महसुली नोंद घेण्याची मागणी अनेक वर्षापासून गावकरी करत आहेत.पण प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. मागील कित्येक वर्षा पासून वाघदरी गाव महाराष्ट्रात असून ही याची नकाशावर नोंदच नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
धमकी देऊन तिघांचा आळीपाळीने अत्याचार, बायकोने नवऱ्याला हकीकत सांगताच पायाखालची जमीन सरकली

सहायक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली गावाला भेट

वाघदरी हे गाव पूर्वी तेलगंणा राज्यात होतं . १९९४ – ९५ साली तेलगंणा राज्यातून महाराष्ट्रात या गावाचा समावेश झाला. या गावात २५० लोकांची वस्ती आहे.पण, अद्याप पर्यंत गावाची महसूल नोंद झाली नाही. तब्बल २८ वर्षा नंतर गावाच्या महसूल नोंदीसाठी प्रशासनाने दखल घेतली आहे. किनवटचे सहायक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वाघदरी गावाला भेट दिली. दुचाकीवर प्रवास करुन सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करुण गावकऱ्यांशी चर्चा देखील केली. लवकरच मोजणी करुण गावाची महसूल नोंद केली जाणार आहे, त्यानंतर त्यांना सातबारा आणि वन पट्टा दिलं जाणार असल्याचे सहायक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
लोकसभेसाठी मी कामाला लागलोय, पण…; भाजप खासदार चिखलीकरांची धाकधूक वाढली, कारण काय?

शेती कसली पण शेताचा सातबाराच नावावर नाही; महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या गावाचा जमिनीसाठी संघर्ष

Read Latest Maharashtra News And Marathi News

अर्जुन राठोड यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed