• Sat. Sep 21st, 2024

अवकाळी पावसासह रानगव्याच्या कळपाकडून स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळी पावसासह रानगव्याच्या कळपाकडून स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मटा प्रतिनिधी : गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण, त्यातच शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले. त्यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी अनेक संकटांनी थकला आहे. रात्री महाबळेश्वर तालुक्यातील भिलारजवळील कासवंड परिसरात रानगव्याच्या कळपांनी स्ट्रॉबेरीसह गहू पिकाचे मोठे नुकसान केले आहे. यात साधारण पाच हजार फळ धारण केलेले स्ट्रॉबेरीची रोपे अक्षरशः पायदळी तुडवली आहेत.

कुणाला घाबरून नाही, तर समाज स्वास्थ्यासाठी शब्द मागे घेतो; लायकी नसणाऱ्यांच्या…, वक्तव्यावर मनोज जरांगे पाटीलांचे स्पष्टीकरण
महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी हंगामास गेल्या महिन्यात प्रारंभ झाला असून, स्ट्रॉबेरीचे उत्पादनही सुरू झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्याचा परिणाम फळ उत्पादनावर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे छोटी फळे लवकर पिकत असल्याने ते मार्केटमध्ये लवकर विक्रीसाठी आणले जात आहे. मात्र, सर्वत्रच परिस्थिती अशी निर्माण झाल्याने आवक वाढ होऊन दर घटला आहे. झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने त्याचा आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

Shubman Gill: शुभमन गिलला कर्णधार करण्याचा निर्णय येऊ शकतो अंगलट, गुजरात टायटन्सचे कुठे चुकले
आज रात्री भिलारनजीक असलेल्या कासवंड येथील एकनाथ महादेव गोळे यांच्या स्ट्रॉबेरी शेतात गव्याच्या काळपाने धुडगूस घालून एकरभर शेतीचे नुकसान केले आहे. त्यातच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी, गहू पिकही खाल्ले आहे. हातातोंडाशी आलेली पीक ऐन हंगामात खाल्ल्याने शेतकऱ्याचे आर्थिक घडी कोलमडणार आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता ही स्ट्रॉबेरी पिकावरच अवलंबून आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे साधारण तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे.

मुलाचा अपघाती मृत्यू, विम्याचे पैसे मिळाले पण आई-वडील न्यायालयात, सुनेला पैसे काढण्यास बंदी, काय घडलं?
गेल्या तीन-चार दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याचाही वावर असल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वन विभागाने या परिसरातील घटनांकडे गांभीर्याने पाहून उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे शेती पिकाचे संरक्षण व्हावे, यासाठी वन हद्दीत तार कंपाऊंड करावे. नुकसान झालेल्या स्ट्रॉबेरी पिकाचा पंचनामा करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अवकाळी पावसानं द्राक्ष बागा कोलमडल्या, बागायतदारांचं लाखोचं नुकसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed