• Sat. Sep 21st, 2024

हक्काच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख शेतकऱ्यांसह रस्त्यावर, महामार्ग अडवला कारण…

हक्काच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख शेतकऱ्यांसह रस्त्यावर, महामार्ग अडवला कारण…

अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव चौफुला येथे माजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले.तब्बल दोन तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते.

चालू वर्षी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं नाही तसेच मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातही पुरेसा पाऊस झालेला नाही.. विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे.. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांची वस्तुस्थिती माहिती असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी मुळा धरणातून २.१० टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी म्हंटलंय.

दरम्यान नगर- नाशिक जिल्ह्यातील पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी मराठवाड्यातील नेते एकत्रित येतात मात्र नगर-नाशिकचे नेते एकत्र येताना दिसत नाही अशी खंतही गडाख यांनी व्यक्त केली.. नाशिकचे नेते एकत्रित येतील की नाही माहिती नाही पण नगर जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र यायला हवं आणि समन्यायी पाणी वाटपाबाबत पुनर्विचार व्हायला हवा अशी मागणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे.

IND vs SL Live: शुभमन गिल पाठोपाठ विराट कोहलीचे शतक हुकले, ४९व्या शतकासाठी आणखी प्रतिक्षा

नाशिकमध्येही विरोध

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि इतर धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध होताच धरण परिसरात आणि वहन मार्गात जिल्हा प्रशासनाकडून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडलं जाणार असल्यानं नाशिक महापालिकेला पाणी कपात देखील करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पाणी सोडण्यास विरोध दर्शवला होता. आता नाशिकमधील पाणी सोडण्यास विरोधाचं लोण अहमदनगरमध्ये देखील पोहोचलं आहे.
ED Official: ईडीच्या अधिकाऱ्याला १५ लाखांची लाच घेताना अटक, राजस्थान एसीबीच्या कारवाईनं देशभरात खळबळ
दरम्यान, मान्सूनचा पाऊस योग्य प्रकारे न झाल्यानं राज्यात पाणी प्रश्नाची समस्या निर्माण झाली आहे.

नशिबाने दगा दिला; भारताची एक नव्हे दोन शतकं हुकली, शुभमन पाठोपाठ विराटचे विक्रमी शतकाची प्रतिक्षा वाढली

आरक्षण मिळेपर्यंत पाणी पिणार नाही, जरांगेंनी पाणी सोडलं, सरकारला फटकारलं

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed