• Sat. Sep 21st, 2024
Nashik News LIVE Updates | रात्रीच्या अंधारात छापा, बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

नाशिक : एकलहरेपासून जवळील सामनगाव शिवारातील जंगलात एका जुन्या घरात सुरू असलेला बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना नाशिकरोड पोलिसांनी रात्रीच्या अंधारात छापा टाकून उद्ध्वस्त करण्याची धाडसी कामगिरी केली. आतापर्यंत अवैध गुटखा विक्री होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवायांतून स्पष्ट झाले होते. परंतु, सामनगाव शिवारात नाशिकरोड पोलिसांनी केलेल्या कारवाईतून अवैध गुटखा निर्मितीचा कारखानाच सुरू होता ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटखा निर्मितीसाठीची यंत्र सामुग्री, रसायने, चुना, कच्ची तंबाखू, सुपारी, गुलाबपाणी, रासायनिक पावडर, कात पावडर, सुगंधी द्रव्ये, प्रिंटर, पॅकिंग मशीन, वजनकाटा असा एकूण २ लाख १३ हजार ९२० रुपये किमतीचा साठा जप्त केला.

या कारवाईत गुटखा कारखान्यात अवैध गुटखा निर्मिती करणाऱ्या दिनेश बाबुलाल कुमार (वय ३५, रा. कानपूर उत्तर प्रदेश, सध्या रा. अरिंगळे मळा, सिन्नर फाटा), नीलेश दिनेश इंगळे (वय ३३, रा. अंबड) आणि दीपक मधुकर चव्हाण (वय ४५, रा. उत्तमनगर, अंबड) या तिघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शेळके, पोलिस नाईक पुंडलिक ठेपणे, पोलिस शिपाई संतोष पिंगळ, पोपट पवार, अविनाश हांडे, बाळकृष्ण सोनवणे, ताज्कुमार लोणारी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

‘आई मला वाचव’, फोनवर बोलताना अपहरण; अखेर बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांची सुखरुप घरवापसी

मालेगावकरांना सिग्नलचे वावडे!

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील मोसमपूल सर्कलवरील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून नोव्हेंबर २०२० मध्ये पहिलीवहिली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. परंतु, सुरुवातीपासूनच या सिग्नलला घरघर लागल्याचे चित्र होते. लोकार्पणानंतर लगेचच ही यंत्रणा बंद पडली ती आजवर सुरू झालेली नाही. वाहतूक शाखा, महापालिकेलाही याचे सोयरसुतक नाही तर नागरिकांना ‘सिग्नल यंत्रणेचे वावडे’ असल्याचेच दिसून येत आहे.

महागाईची विघ्नछाया! ऐन सणासुदीत डाळी, तांदळासह साखरेच्या दरात मोठी वाढ; अशा आहेत किंमती
याच आठवड्यात मोसमपूल सर्कलवर झालेल्या अपघातात १२ वर्षीय विद्यार्थ्याला जीव गमावावा लागल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सर्कलवर शहरातील सर्वच भागातून वाहतूक येऊन मिळते. तत्कालीन नगरसेवक अॅड. गिरीश बोरसे यांच्या निधीतून येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात आले. स्वतः पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सिग्नलची प्रायोगिक चाचणी घेऊन यंत्रणा सुरू करण्यात आली. परंतु, परिसरातील अतिक्रमणे, डावीकडील वळण नसणे, अनधिकृत रिक्षा थांबे, बेशिस्त वाहनचालक अशा समस्यांवर तोडगा न काढताच सिग्नल सुरू करण्यात आल्याने सुरुवातीपासूनच ही यंत्रणा ‘असून अडचण नसून खोळंबा’ ठरली. शहरातील एकात्मता चौकातील सिग्नलचीही अशीच अवस्था झाल्याने तेथील सिग्नलही बंद आहेत.

जिल्ह्यात बंद; शहरात संमिश्र! जालन्यातील लाठीमाराचा नाशिकमध्ये निषेध, या मार्गाने गेला मोर्चा

कर्जवसुलीच्या तगाद्याने शेतकऱ्याचा मृत्यू?

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने जप्त केलेल्या शेतजमिनीचा ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जाहीर लिलावाचा धसका घेतल्याने दगडपिंप्री (ता. दिंडोरी) येथील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. जोपर्यंत बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत वणी ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

पावसाची दांडी अन् पिकांचं नुकसान, शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

दगडपिंप्री येथील दिलीप अमृता चौधरी (वय ४९) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी सकाळी आठला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी पिंप्री अंचला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून २००८ मध्ये ९१ हजारांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जावर आजअखेर २३ लाख ४३ हजार ४२४ रुपयांची थकबाकी अधिक व्याज व अनुषंगिक खर्च अशी रक्कम वाढत गेली. या रकमेच्या वसुलीसाठी बँकेने शेतजमिनीच्या लिलावाची नोटीस दिली, तसेच थकबाकी वसुलीसाठी तगादा सुरू केला. याचा दिलीप चौधरी यांनी धसका घेतल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. त्यातच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed