• Wed. Aug 5th, 2026

    Uddhav Thackeray: फुटण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांना दणका देण्यासाठी ठाकरेंचं पहिलं मोठं पाऊल; कायदेशीर पेचात अडकवणार!

    Uddhav Thackeray: फुटण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांना दणका देण्यासाठी ठाकरेंचं पहिलं मोठं पाऊल; कायदेशीर पेचात अडकवणार!

    मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दुसऱ्यांदा मोठी फूट पडणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत नऊपैकी केवळ चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर यातील काही खासदार आता नवी दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पहिलं पाऊल उचललं आहे. ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी लोकसभचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहीत कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला स्वतंत्र गट म्हणून ओळख, दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार देऊ नयेत, अशी मागणी केली आहे.

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊपैकी सहा खासदार आधी आपला स्वतंत्र गट स्थापन करतील आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर कायद्यातील तरतुदींचा आधार घेत या खासदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन दिलं आहे. या निवेदनात अरविंद सावंत यांनी लोकसभा सभापतींना उद्देशून म्हटलं आहे की, “माध्यमांतील वृत्तांनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोकसभेतील काही खासदारांनी स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी, यासाठी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे किंवा असा संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अशा कोणत्याही मागणीला आपण प्रतिसाद देऊ नये किंवा याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी,” असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

    दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संविधानातील दहाव्या अनुसूचीतील (Anti-Defection Law) तरतुदींचा वापर करण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचेही निवदेनातून स्पष्ट केले आहे.

    कोणकोणते खासदार पक्षांतर करण्याच्या तयारीत?

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेत सध्या नऊ खासदार आहेत. यातील अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दोन खासदार वगळता इतर सात खासदारांबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यामध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. यातील राजाभाऊ वाजे यांच्याबाबत अनिश्चितता असली तरी उर्वरित सहा खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानला जात आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed