• Sat. Mar 7th, 2026

    Weather Forecast: राज्यासाठी गुड न्यूज, मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी आली, पुढील सहा दिवस पाऊस…

    Weather Forecast: राज्यासाठी गुड न्यूज, मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी आली, पुढील सहा दिवस पाऊस…

    पुणे: गेल्या दोन आठवड्यात पावसाने दांडी मारल्यानंतर पुन्हा पावसाचा हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस येणाऱ्या पाच ते सहा दिवस पडणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे राज्यासाठी थोडीफार का होईना ही दिलासा देणारी बातमी आहे.

    पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापुरात अत्यल्प पाऊस

    पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर, पुणे, पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत अत्यल्प पाऊस म्हणजे ०५ ते १.५ मीमी पाऊस असणार आहे. तसेच, कोकण भागात जेसे की सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यातील पावसाची स्तिथी अतिशय कमी असणार आहे. ०१ मिलिमीटर तर काही दिवशी १५ मिलिमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आवली आहे.

    पावसाची ओढ, बळीराजाला घोर; २१ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, चिंता वाढली
    काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अत्यंत कमी

    मराठवाडा विभागात जसे की धरावी, धाराशिव, हिंगवली बीड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अल्पशा पावसाचं प्रमाण राहणार आहे. २ मिलिमीटर ते ४ मिलिमीटर पाऊस राहणार आहे. इतर सर्व जिल्ह्यात ०.१ ते १.३ मिलिमीटर पर्यंत पाऊस राहणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

    धाराशिव जिल्ह्यात पाऊस लांबला बळीराजा पुन्हा अडचणीत

    काही जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर

    येणाऱ्या दिवसात पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे. काही जिल्हे हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत, अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

    ज्याला दगड समजलं तो तर खजिना निघाला, एका रात्रीत शेतकऱ्याचं नशीब पालटलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed