• Sat. Sep 21st, 2024

घड्याळ चिन्ह अन् अजित पवारांचं नेतृत्त्व, सुनील तटकरेंनी सभेआधी प्लॅन सांगितला

घड्याळ चिन्ह अन् अजित पवारांचं नेतृत्त्व,  सुनील तटकरेंनी सभेआधी प्लॅन सांगितला

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी छत्रपती संभाजीगनरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्हाला टी- ट्वेंटी आणि ५० षटकांचे सामने जिंकायचे असल्याचं म्हटलं. म्हणजेच त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी तयारी सुरु असल्याचं सांगितलं आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना तटकरे यांनी मी सुद्धा क्रिकेटमधला खेळाडू आहे पण या संदर्भात मी काही बोलणार नाही. अचूक टप्प्यावरच्या चेंडूला देखील काही काही वेळेला षटकार बसू शकतो. आम्ही केवळ निर्धाव ओवर काढण्यासाठी मैदानात उतरलो नाही. मार्च एप्रिल मध्ये येणारी टी-ट्वेंटी आम्हाला जिंकायची आहे. याशिवाय ५० षटकाचे सामने आम्हाला ऑक्टोबर मध्ये जिंकायचे आहेत, असं सुनील तटकरे म्हणाले. टेस्ट प्रमाणे पुढच्या पाच वर्षासाठी काम आम्हाला चालू ठेवायचे आहे. या तिन्ही पद्धतीच्या खेळासाठी आम्ही तयार झालेलो आहोत, असे तटकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे त्यांचा फुटलेला पक्ष अधिक फुटू नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही जनतेमध्ये जातो आहोत. जनतेची सेवा करण्यासाठी आणि त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि व्यापक प्रमाणामध्ये जनाधार एन डी ए च्या पाठीमाग कसा निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं तटकरे म्हणाले. पावसाळ्याने ओढ दिली असल्यामुळे मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परभणीला येत असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जी बैठक घेतली आहे.

शरद पवारांना अजित पवार यांच्या भेटीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. या संदर्भात मी काही बोलणार नाही. दादांच्या नेतृत्वात घेतलेला निर्णय ,त्या निर्णयाशी आम्ही ठाम आहोत. उद्याच्या भविष्यातील निवडणुका अजित पवार यांच्या नेतृत्वात घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहोत, असं तटकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी, योजना सगळ्या कागदावरी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
संजय राऊत चांगले संपादक आहेत, माझ्या जिल्ह्यातील आहेत. माझा त्यांचा चांगला परिचय आहे. मात्र त्यांचं थोडं मानसिक संतुलन बिघडल्यासारखंच झालं असल्याचं चित्र निर्माण झाल आहे.केवळ रोज वेगवेगळे दावे करणे आणि माध्यमांसमोर जाणं हा एकमेव उद्देश नजरेसमोर ठेवून ते काम करत आहेत. २०१९ ला शब्दप्रयोग होता की खिडकी उघडलं की पाऊस, आणि टीव्ही लावला की राऊत तशी परिस्थिती होती. आता संजय राऊत यांच कुठलंही मत महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने घेत नाहीत, असं तटकरे म्हणाले.
मोठी बातमी! दीड महिना भाविक खंडेरायाच्या दर्शनापासून वंचित राहणार, जेजुरीचा गाभारा बंद
अजित पवार ७० ते ७५ दिवसांच्या कालावधीनंतर बारामतीत गेले. त्यावेळेस नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं. त्यांचा बारामतीकरांवर विश्वास आहे अन् बारामतीकरांचा त्यांच्यावर विश्वास आहे.त्यामुळे उस्फूर्तपणे त्यांनी स्वागत केलं. यामुळे अंबादास दानवे काय म्हणतात याला महत्त्व नाही. आम्ही अंबादास दानवे यांच्यापेक्षा जास्त संवेदनशील आम्ही आहोत. ज्या वेळेला अजित दादांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम घेतले होते त्यावेळेला इर्शाळवाडी ची घटना घडली.त्यावेळी आम्ही कार्यक्रम आम्ही रद्द केले होते. इतके संवेदनाशील आम्ही आहोत. यामुळे अंबादास दानवे यांच्याकडून आम्हाला संवेदना शिकून घेण्याची गरज नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.

Mumbai Galaxy Hotel Fire : मुंबईत पुन्हा अग्नितांडव, हॉटेलला भीषण आग, तिघांचा होरपळून मृत्यू, काय घडलं?

अजिबात नाही, मलिकांशी कोणतीही राजकीय चर्चा नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed