• Sat. Sep 21st, 2024

रत्नागिरीतील तरुणीच्या मृत्यूचं गुढ वाढलं, केस,भुवया नसलेला मृतदेह सापडल्याने पोलीस चक्रावले

रत्नागिरीतील तरुणीच्या मृत्यूचं गुढ वाढलं, केस,भुवया नसलेला मृतदेह सापडल्याने पोलीस चक्रावले

चिपळूण: कोकणातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या निलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलीस अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. याप्रकरणी नीलिमा चव्हाण हिची बॅग व मोबाईल या दोन वस्तूंचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी खेड येथील जगबुडी नदी दोन बोटी व ५० ते ६० कर्मचाऱ्यांचे पथकं वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त केले आहे याचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. नीलिमा चव्हाण ही जगबुडी नदीच्या जुन्या बंद असलेल्या पुलाकडे चालत गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यानंतर निलिमाचे नेमके काय झालं याचे गुढ अद्याप कायम आहे. दरम्यान नीलिमा चव्हाण हिचा मृतदेह ज्यावेळी दाभोळ खाडीत मिळाला तेव्हा या मृतदेहाच्या डोक्यावरती केस व भुवयांवरती केस नव्हते त्यामुळे या प्रकरणाचे गुढ अधिक वाढले आहे. हे केस का नव्हते याबद्दल मात्र अद्याप प्रश्नचिन्ह आहे. पोलीस तपासयंत्रणा सगळ्या दिशेने या युवतीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा पोहोचलेल्या नाहीत त्यामुळे नीलिमांच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे.

जिल्हा पोलीस तपास यंत्रणा सगळ्या बाजूने तपास करत आहेत त्यामुळे अधिकृत अंतिम निष्कर्षापर्यंत पोलीस तपास यंत्रणा कधी पोहोचतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच विषयावरून जिल्हाभरातून विविध सामाजिक संस्थांकडून याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण पावसाळी अधिवेशनातही आमदार भास्कर जाधव यांनी मांडल होत, चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. या सगळ्या प्रकरणात पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर तपास करत आहेत.

आधी कोयत्याने बायकोला संपवलं, नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला

या सगळ्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. मुणगेकर, दापोलीचे पोलीस निरीक्षक श्री.अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणांच्या एकूण आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत.जिल्हाभरात या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. आजपर्यत जवळपास १०० पेक्षा अधिक व्यक्तिची पोलिसांनी चौकशी करण्यात आली आहे

नीलिमा हिचे शेवटचे मोबाईलचे लोकेशन हे खेड येथील येत होते हे लोकेशन खेड भोस्तेजवळ आहे. याच परीसरात उतरून तिने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जुना भरणे येथील वाहतुकीसाठी बंद असलेला पूल आहे याच पुलाच्या दिशेने ती चालत गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलीस तपास यंत्रणा याबाबत अजूनही याप्रकरणी युद्धपातळीवर तपास करत आहेत. खेड जगबुडी नदीत दोन बोटी व पन्नास ते साठ कर्मचारी निलिमाची बॅग व मोबाईल याचा शोध घेत आहेत. या दोन वस्तू पोलिसांच्या हाती लागल्यास नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात मोठा उलगडा होऊ शकतो. निलिमाची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. स्टेट बँकेच्या दापोली शाखेत ती कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होती. नीलिमा चव्हाण हिची मानसिक स्थितीही त्यादिवशी कशी होती याचाही अंदाज या तपासात लावला जात आहे.

मी गावी जाते आहे हे शब्द अखेरचे ठरले, बेपत्ता २४ वर्षीय युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

दरम्यान, बेपत्ता होण्यापूर्वी नीलिमा आपल्या एका मैत्रिणीला भेटली होती. या दोघींची भेट अनेक वर्षांनी झाली होती. वास्तविक नीलिमा हिला मैत्रीण भेटल्याचा आनंद होणे अपेक्षित होते. मात्र, तिच्या चेहऱ्यावर कोणतेच तसे भाव दिसले नाहीत, असेही एक निरीक्षण या चौकशी दरम्यान तिच्या मैत्रिणीकडून तपासात समोर आले आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. निलिमा चव्हाण हिच्या घरच्यांकडून याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवरच आक्षेप घेण्यात आला आहे.

इंदापूर दुर्घटनेतील विहिरीत पडलेल्या मजुरांचा मृत्यु, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह सापडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed