Jalgaon Banana Crop Insurance Scam: जळगावातील सात तालुक्यांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यात चोपडा तालुक्यातून सर्वाधिक बोगस विमा काढण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान एमआरसॅकद्वारे करण्यात आलेल्या तांत्रिक पडताळणीत २८ हजार ४७५ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात केळीची लागवडच नव्हती. तरीही २७ हजार ४१९ शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लागवड असल्याचे भासवून विमा काढल्याचे समोर आले. उर्वरित १७ हजार हेक्टरवर एकाच गटात चार ते पाच शेतकऱ्यांनी विमा काढल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातही २९ हजार शेतकरी संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत.
Eknath Khadse: एकनाथ खडसे अडचणीत! मुक्ताईनगर जमीन व्यवहारप्रकरण अंगलट, महसूलमंत्र्यांचे थेट SIT चौकशीचे आदेश
३७ कोटींची रक्कम जप्त
बोगस केळी पीक विम्याचा हा प्रकार समोर आला नसता, तर शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असते. दरम्यान, कृषी आयुक्तालयाकडून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता या संशयित ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा बजावत सात दिवसांत खुलासा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांनी भरलेली ३७ कोटी रुपयांची विम्याची रक्कम राज्य शासनाने जप्त केली आहे. ज्या ४८ सीएससी केंद्रांमध्ये हे बोगस फॉर्म भरून दिले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
Jalgaon News : ‘निलेशचा मोबाईल बंद आहे, त्याला उठवा’; चुलत भावाने दरवाजा उघडताच भयंकर दृश्य, पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं
चोपडा तालुक्यात सर्वाधिक बोगस विमा
७ हजार २४३ शेतकऱ्यांनी शेतात केळी नसतानाही विमा काढल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी ८ हजार ४१९ हेक्टरवर केळी नसताना केळी पीक दाखवले आहे. त्या खालोखाल यावल तालुक्यात ५ हजार ३६८ शेतकऱ्यांनी बोगस विमा काढला आहे. त्यापाठोपाठ रावेर, जळगाव, धरणगाव, मुक्ताईनगर व जामनेर तालुक्याचा समावेश आहे.
