• Sat. Sep 21st, 2024

भाजपला लोकसभेला किती जागा मिळणार? माजी केंद्रीय मंत्र्यानं आकडा सांगितला, कारणही सांगितलं

भाजपला लोकसभेला किती जागा मिळणार? माजी केंद्रीय मंत्र्यानं आकडा सांगितला, कारणही सांगितलं

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली नऊ वर्षे देशात विकासाचे, जनतेचे राजकारण केले. जनतेचा विश्वास कमावला. हा विश्वासच आमची ताकद असून, आगामी लोकसभेत भारतीय जनता पक्षाला ३५०हून अधिक आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४००हून अधिक जागा मिळतील,’ असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी केला. गॅस दरवाढ, इंधन दरवाढ जागतिक कारणांमुळे होत असल्याचे सांगून या प्रश्नांना त्यांनी शिताफीने बगल दिली.

मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील ‘एनडीए’ सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते. या वेळी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. ‘मोदींच्या नेतृत्वात देशात नऊ वर्षे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. गेल्या नऊ वर्षांत देशात बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले झाले नाहीत. दीडशे जिल्ह्यांतील नक्षलवादी फक्त दीड जिल्ह्यांपुरतेच उरले. कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमधील दगडफेक थांबली आणि प्रगती सुरू झाली. जी २० ची बैठकही तिथे यशस्वीरीत्या पार पडली,’ असे जावडेकर म्हणाले.
बृजभूषण सिंह यांना वाचवण्याची केंद्राची धडपड, चर्चेच्या प्रस्तावाची तयारी, सरकारचं टेन्शन वाढवणारी अपडेट समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘देश प्रथम’ नीती त्यासाठी सतत कष्ट आणि ‘सन्यस्त कर्मयोगी’ ही प्रतिमा देशाला पुढे नेत आहे. मात्र, सध्याच्या नतद्रष्ट विरोधकांना हे सहन होत नाही. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी जागतिक पातळीवर भारताला विशेष स्थान नव्हते. कोव्हिड काळात तीन लशी विकसित करीत भारताने त्या इतर देशांनाही पुरवल्या. लस वितरणासाठीचा कोविन प्लॅटफॉर्म, भीम आणि यूपीआय आता जगभर वापरले जात आहे, त्यामुळे जगात भारताचा बोलबाला झाला, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकारकडून महत्त्वाचे फेरबदल, सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, या अधिकाऱ्याची २४ तासांत पुन्हा बदली

जावडेकर म्हणाले…

– जगातील विकसित देशांपेक्षा भारताला महागाई दर कमी ठेवण्यात यश.

– भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यस्था.

– इतर विकसित देशांच्या तुलनेत भारताचा विकासदर अधिक.

– नवनवे महामार्ग, विमानतळ, जलवाहतूक मार्ग, मेट्रो, रेल्वे प्रकल्पांमुळे विकासाला चालना
Odisha Train Accident: मालगाडी,एक्स्प्रेस गाड्या एकमेकांना कशा धडकल्या, रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक कारण समोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed