• Thu. Mar 12th, 2026

    यंदा डाळ मिळणार स्वस्तच? केंद्र सरकारकडून तूर व उडीद डाळीबाबत महत्वपूर्ण निर्णय

    यंदा डाळ मिळणार स्वस्तच? केंद्र सरकारकडून तूर व उडीद डाळीबाबत महत्वपूर्ण निर्णय

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : कमी उत्पादनामुळे दरवाढीच्या दिशेने सुरू असलेल्या डाळींच्या प्रवासावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने साठ्यावर मर्यादा आणली आहे. याअंतर्गत किरकोळ दुकानात कमाल ५ टनापर्यंतच साठा करता येणार आहे.यंदा डाळ उत्पादनात सरासरी १० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे एकीकडे दरवाढ सुरू असतानाच दुसरीकडे साठेबाजही सक्रिय झाले आहेत. डाळींचा साठा होऊन कृत्रिम दरवाढ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी विशेष समिती स्थापन केली होती. या समितीने राज्य सरकारी अन्नधान्य वितरण विभागासह अभ्यास केला. त्यानुसार आता साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने साठ्यावर मर्यादा आणली आहे.

    घाऊक विक्रेता अधिकाधिक २०० टन डाळीचा साठा करू शकतो. हीच मर्यादा किरकोळ विक्रेत्यांसाठी ५ टन आहे. तर दुकानांची साखळी चालविणाऱ्या सुपर मार्केटला दुकानात ५ टन आणि गोदामात २०० टनाच्या साठ्याचीच परवानगी असेल. तर डाळी तयार करणाऱ्या गिरण्यांना एकूण तीन महिन्यांचे उत्पादन अथवा गिरणीच्या वार्षिक स्थापित क्षमतेचे २५ टक्के, यापैकी जे अधिक असेल, तेवढ्या साठ्याची मर्यादा असेल. आयातक अधिकाधिक ३० दिवसांचा साठा ठेऊ शकतील. या मर्यादा ३१ ऑक्टोबरपर्यंत उडीद व तूरडाळीसाठी असतील.

    भारत हा डाळींचे सर्वाधिक सेवन करणारा देश आहे. त्यामध्ये तूरडाळ अग्रस्थानी असते. दरवर्षी ४२ ते ४४ लाख टन तूरडाळीची भारतात विक्री होते. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशात ४२.२० लक्ष टन तूर उत्पादन घेण्यात आले होते. यंदाचे लक्ष्य ४५.५० लक्ष टन इतके होते. प्रत्यक्षात मात्र फक्त ३६.६६ लक्ष टन इतकेच उत्पादन झाले आहे. तुरीपासून सर्वोत्तम डाळ ही साधारण ३० टक्के, मध्यमखाद्यतेल पुन्हा आवाक्यात? मुबलक आयात व साठ्यामुळे दर घसरणीचे संकेत, कशा असतील किंमती? दर्जाची ३० टक्के तर निम्न दर्जाची २० ते ३० टक्के असते. जवळपास १८ ते २० टक्के तूर ही डाळ प्रक्रियेत वाया जाते. यानुसार यंदा तूरडाळीची मागणी व पुरवठा यांच्यात साधारण ३ ते ५ लाख टनाची तफावत राहण्याची शक्यता ‘नॅशनल बल्क हॅण्डलिंग कॉर्पोरेशन’ने (एनबीएचसी) याआधीच वर्तवली होती. त्यानुसार आता तूरडाळ तुटीमुळे संभाव्य दरवाढीची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साठा मर्यादा आणली आहे.

    किरकोळ विक्रेत्यांचा विरोध

    या साठा मर्यादेतून किरकोळ विक्रेत्यांना दूर ठेवावे, अशी मागणी अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) केली आहे. वास्तवात डाळींचा साठा हा मोठ्या कंपन्यांकडे असतो. किरकोळ विक्रेत्यांकडे साठा करण्याइतकी जागादेखील नसते. त्यामुळे त्यांना दूर ठेवावे, अशी मागणी ‘कॅट’चे महाराष्ट्र सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed