• Tue. Mar 10th, 2026
    चला बारसूला, बघतो पोलिसांच्या गोळ्या आम्हाला अडवतायेत का? राजू शेट्टींचा एल्गार

    कोल्हापूर : रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या येथे आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांडा फोडत लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तेथील शेतकऱ्यांना एकटं पडू देणार नाही, हजारो शेतकऱ्यांना घेऊन मी बारसूत जाईन, असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. त्याचवेळी भूमीपुत्रांना लाठ्यांनी मारता, लोकशाही राज्यात असं वर्तन करायला पोलिसांना शरम वाटत नाही का? असा परखड सवालही त्यांनी विचारला आहे.

    बारसू महाराष्ट्रातच आहे की आणखी कुठे? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच जर तुम्ही ते काहीच शेतकरी आहेत असे समजत असाल तर राज्यातील सर्व शेतकरी आम्ही एकत्र आणू आणि बारसूच्या शेतकऱ्यांमागे ताकद उभी करु, असा सांगत चलो रत्नागिरीचा नारा त्यांनी पुकारला आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्राचार्य जालिंदर पाटील यांच्यासह कार्यकर्ते रत्नागिरी येथील बारसूला निघाले असता त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    Barsu Refinery : पोलिसांनी गाडीत कोंबलं, आंदोलकांचा पिंजऱ्यातून एल्गार, जीव मारा पण मागे हटणार नाही!
    बारसूचे ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पडणारच या भूमिकेवरती ठाम आहेत. पोलीस प्रशासनाने माती परीक्षण होऊ द्या, असं आवाहन केल्यानंतरही शेतकरी ते न होऊ देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या भूमिकेने त्रस्त झालेल्या पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर अनेकांना पिंजऱ्यात भरुन पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं. या प्रकाराविरोधात राजू शेट्टी आक्रमक झाले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी चलो रत्नागिरीचा नारा दिला आहे.

    जमिनी खरेदी केल्यात, रेट ठरलेत, कमिशन ठरलंय, त्यामुळे काहीही करुन सर्वेक्षण करा, दिल्लीतल्या मोगलांचे आदेश: राऊत
    जी शेती करतो, ती शेती प्रकल्पासाठी देण्याची शेतकऱ्यांची इच्छा नसेल तर जबरदस्ती कशासाठी? लोकशाही राज्यात शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करत आहे. पोलिस शेतकऱ्यांना मारझोड करत आहेत, त्यांना शरम वाटत नाही का? असे सवाल करुन राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढलेत.

    बारसू पेटलं, शेतकरी भूमिकेवर ठाम, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, रणरणत्या ऊन्हात लाठीचार्ज
    लोकशाही राज्यात अशा पद्धतीचे अत्याचार सहन करून घेतले जाणार नाही. सरकार जर हे काहीच शेतकरी आहेत असे समजून त्यांच्यावर लाठीचार्ज करत असतील तर आम्ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांना बारसूमध्ये एकत्र येण्याचं आवाहन करू, असे म्हणत बारसू शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी चलो रत्नागिरीचा नारा राजू शेट्टी यांनी दिलाय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed