राष्ट्रीय स्तरावरील सत्तेची सर्व सूत्रे भाजपा कडे आहेत,पण महाराष्ट्रात विचार केला तर सत्तेची सूत्र एकहाती भाजपच्या हातात कधीच मिळालेली नाहीत आणि मिळण्याची शक्यताही नाही, असं व्यक्तव्य खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे.ते जालन्यात बोलत होते.
राष्ट्रीय स्तरावर भाजप ३५० खासदार निवडून आणू शकतं.महाराष्ट्राबाहेर शिवसेना नाही, महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी २६-२२ असं वाटप झालं होतं. आमचे १८ आले ४ पडले, त्यांचे २३ आले ३ पडले ही स्थिती आहे.राष्ट्रीय स्तरावर जरी भाजपनं ३५० खासदार निवडून आणले तरी महाराष्ट्रात त्यांची स्थिती वेगळी आहे, असं कीर्तिकर म्हणाले.
ठाकरेंनी २०१९ला तिकीट दिलं आणि जिंकवून आणलं तरी कीर्तिकरांनी साथ सोडली
महाराष्ट्रात भाजप कमकुवत आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र, महाराष्ट्रात ती शिवसेना पेक्षा मजबूत आहे असही आम्ही मान्य करणार नाही, असं कीर्तिकर स्पष्टच बोलले.
२०१९ ला विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपचे जागावाटप झाले होते. त्यावेळी शिवसेनेला १२६ आणि भाजपला १६२ जागा असं वाटप झालं होत. १६२ मधून १०५ आले आणि १२६ मधून आम्ही ५६ जण निवडून आलो. यावेळचा फॉर्म्युला ही १०० टक्के तसाच असला पाहिजे, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.
आमच्याकडे उमेदवार तयार आहेत,एका एका ठिकाणी ४/४ उमेदवार रांगेत आहेत, असही किर्तीकर म्हणाले.अजित पवारांनी पहाटेला भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करण्याचा एक प्रयत्न केल्याचं आपण पाहिलं आहे . आमचा काही विरोध नाही.राष्ट्रवादीचे काही आमदार घेऊन अजित पवार जर बाहेर पडत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू असही किर्तीकर म्हणाले होते.