• Thu. Mar 19th, 2026
    Satara ZP : दगाफटक्याच्या भीतीने राष्ट्रवादी-शिवसेनेचे सदस्य पर्यटनाला, अध्यक्ष आपलाच होईल दावा करणाऱ्या भाजपची चिंता वाढली

    सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत आहे. विशेष म्हणजे भाजपने सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्याने आपलाच अध्यक्ष होईल, असा दावा केला आहे. दुसकीकडे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची घट्ट मैत्री झाली आहे. त्यांचे निवडून आलेले सदस्य दगाफटका होऊ नये म्हणून सहलीला गेले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : रायगडमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सोबत घेतले आहे. साताऱ्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे राजकीय सूत चांगलेच जुळले आहे. त्यामुळे भाजपला रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेत वाटा मिळेल, पण सर्वाधिक सदस्य असतानाही साताऱ्यात सत्तेच्या वाट्यासाठी झगडण्याची वेळ भाजपवर आली आहे.

    जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचे काउंटडाउन सुरू झाले असताना राष्ट्रवादीच्या सदस्यांचा म्हैसूरमधील प्रसिद्ध वृंदावन गार्डन आणि पंचतारांकित हॉटेल रॉयल ऑर्किडसमोरील एक फोटो नुकताच समोर आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे झेडपी सदस्य दक्षिण भारतातील कर्नाटक आणि केरळमध्ये ट्रीप एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड 20 मार्च रोजी होणार आहे. कमळ चिन्हावर निवडून आलेले भाजपचे 27 आणि एका अपक्षाच्या पाठिंब्यासह सर्वाधिक 28 सदस्य असल्याने अध्यक्ष हा भाजपचाच झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका भाजप नेते जयकुमार गोरे यांनी घेतली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस 20, शिवसेना 15, काँग्रेस 1 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, अशा 37 सदस्यांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत.

    भाजपकडून घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा संभाव्य धोका ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या सदस्यांना ‘सेफ स्टेट’ म्हणून दक्षिण भारतातील काँग्रेस शासित कर्नाटक, केरळच्या सहलीवर पाठवले आहे. सदस्यांची संपूर्ण बडदास्त ठेवण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांनी आपल्या खास शिलेदारांवर सोपवली आहे. म्हैसूर, उटीमध्ये राष्ट्रवादीचे झेडपी सदस्य पर्यटनाचा आनंद लुटतानाचे एक छायाचित्र देखील समोर आले आहे.

    जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला 10 दिवस उरले आहेत. त्यामुळे अध्यक्ष निवडीचे काउंटडाउन सुरू झाले आहे. अध्यक्ष निवडीत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून आपापल्या सदस्यांना व्हीप काढला जाईल. पण मतदान गुप्त पद्धतीने होणार की हात वर करून होणार? हे देखील महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपुर्वी 16 मार्चला जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती निवडी होणार असून काही पंचायत समितींमध्ये राजकीय उलथापालथी पाहायला मिळतील.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा