“मी मुख्यमंत्री असताना नेहमीच सांगायचो की, मी मुख्यमंत्री नाही तर सर्वसामान्य माणूस आहे. आज मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मी महाराष्ट्राचा DCM म्हणजेच डेडिकेटेड कॉमन मॅन आहे”, असं एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लंडन : ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी इंग्रजीत भाषण केलं. एकनाथ शिंदे यांनी जवळपास अर्धा तास इंग्रजीमध्ये भाषण केलं. यावेळी त्यांनी भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापासून ते दिवंगत ज्येष्ठ कवी सुरेश भट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेचा मुद्दा मांडला. भारत-ब्रिटन संबंधांबाबत भाष्य केलं. तसेच त्यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात केलेल्या कामांची माहिती दिली. आपल्या भाषणात त्यांनी लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी योजनांचा देखील उल्लेख केला.
‘हा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा सन्मान’
“नमस्कार! जय हिंद! जय महाराष्ट्र! छत्रपती शिवाजी महाराज की जय! भारत माता की जय! या ऐतिहासिक सभागृहात पुरस्कार स्वीकारण्याचा सन्मान मिळत आहे. हे सभागृह लोकशाही, अनेक महत्त्वाच्या चर्चासत्रांच्या गेल्या अनेक दशकांचे साक्षीदार आहे. मी विनम्रपणे हा पुरस्कार स्वीकारत आहे. हा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा सन्मान आहे”, असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.
Mumbai Local : मुंब्रा-दिवा वळणावर महिला थेट लोकल ट्रेनमधून खाली पडली, घटना कॅमेऱ्यात कैद
शिंदेंकडून सुरेश भट यांच्या कवितेचा उल्लेख
“महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्राचे शासन यांच्यावतीने मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. मी माझ्या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्यावतीने आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या मराठीचे ज्येष्ठ कवी सुरेश भट यांनी आपल्या एका कवितेत मराठीची महती सांगितली आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आम्हाला आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे. आम्ही मराठी भाषा बोलतो याचा मला अभिमान आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिंदेंकडून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक
“भारत आणि ब्रिटन यांच्यात केवळ इतिहासाचे नाते नाही, तर लोकशाही, स्वातंत्र्य आणि मानवतावादी मूल्ये यांचीही समान बांधिलकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोन्ही देशांच्या नात्याने एका सुवर्णकाळात प्रवेश केला आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेबाबत भाष्य केलं. तसेच मोदी यांच्या नेतृत्वाताला जगानेदेखील मान्यता दिली असून विविध देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केल्याचं शिंदेंनी सांगितलं.
Palghar Case : ‘तुमच्या हलगर्जीपणामुळेच नऊ आरोपी फरार’, मुंबई हायकोर्टाचे पालघर पोलिसांवर ताशेरे
शिंदेंचं लाडकी बहीण योजनेबद्दल भाष्य
एकनाथ शिंदे यांनी यावेळी त्यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची माहिती आपल्या भाषणात दिली. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यावेळी उल्लेख केला. “मी भाग्यवान आहे की मला एक सख्खी बहीण आहे. पण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मला अडीच कोटी बहिणींचे आशीर्वाद मिळाले. कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यांमधून आर्थिक मदत मिळाली”, अशी माहिती त्यानी आपल्या भाषणात दिली.
“ही चॅरिटी नाही तर महिलांच्या स्वाभिमान आणि आर्थिक स्वातंत्र्यांसाठी ही मदत करण्यात आली. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर त्यांचं संपूर्ण कुटुंबदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतं. यामुळे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणालादेखील मदत झाली. महिला सबलीकरणासाठी ही योजना महत्त्वाची ठरली. या योजनेची दखल जागतिक स्तरावरील संस्थांनी घेतली”, असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.
Nashik News : दोन दिवसांपूर्वी नाशिक पालिका आयुक्तांचं खड्ड्यांवरुन चॅलेंज अन् दुसरीकडे इंदिरानगरमध्ये मुख्य रस्त्याला मोठं भगदाडएकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी योजनेचादेखील उल्लेख केला. केवळ रस्ते बांधणे म्हणजे विकास नसून तर विकास लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असते, असे एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा