#beed #beedfarmer #beeddrought #baipola मागच्या दोन महिन्यापासून पावसाने दडी मारली म्हणून याचा विपरीत परिणाम शेतीवर आणि शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.जून महिन्यात शेतकऱ्यांनी शेतात पिक पेरणी केली मात्र दोन महिन्यापासून शेतात पाणी नाही , म्हणून पेरलेले उभे पिक करपून गेले आहे.सोयाबीन शेतात लावले मात्र सोयाबीन ला लागलेल्या शेंगा भरल्या नाही आणि जागीच सुकून गेल्या..आज बैल पोळा आहे मात्र आम्ही सण साजरा करू शकत नाहीत.. कारण आधीच खूप कर्ज घेऊन पिक उभे केले आणि हाता तोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर जळून जात आहे सन कुठून साजरा करणार..शेतकऱ्यांनी उपस्थित केला सवाल.