Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी जरांगे यांना भाऊ संबोधून भोजनाचे निमंत्रण दिले, यावर ते बोलत होते.
‘भाऊबीजेला साडी चोळी घेऊन जेवायला जाऊ; पण आत्ता नाही. भाऊ मैदानात आंदोलनात असताना बहिणीने जेवायला बोलावू नये. बहिणीने तेवढा बारकाईने विचार करावा,’ असे मनोज जरांगे म्हणाले.
Liquor Ban in Jalna | अंतरवालीत मनोज जरांगेंचं आंदोलन संपेपर्यंत दारूबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
कुणबी प्रमाणपत्र वाटपाची शिबिरे केवळ आंदोलनापुरती राबवली जात आहेत, की त्यामागे आणखी काही उद्देश आहे, याचा विचार करावा लागेल. मिळालेली जात प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी तर काहींच्या सल्ल्याने हे शिबिर आयोजित केले नाही ना, याकडेही लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांत आपण कोणत्याही शिष्टमंडळाची वाट पाहिली नाही, आपण आपल्या जीवावर आंदोलन करतो. मुंबईला आम्ही जाणारच, असे त्यांनी सांगितले.
भाषेवरून सुरू असलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी तीन वर्षे चांगल्या भाषेत संवाद साधल्याचे सांगितले. मात्र, ते जातीच्या नव्हे, तर पक्षाच्या बाजूने बोलत आहेत. काही व्यक्तींमुळे आपले आणि शिंदे यांचे संबंध खराब झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील वैद्यकीय पथके अंतरवाली सराटीत २४ तास कार्यरत आहेत. आठ सप्टेंबर रोजी जरांगे यांना सात सलाइन लावली होती. नऊ सप्टेंबर रोजी दुपारी एक सलाइन लावले. त्यानंतर रात्री ११.३० वाजता तीन सलाइनद्वारे आयव्हीफ्ल्यूड देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
Nagpur Marbat Festival: कॉक्रोच, मुनीर, महागाईला घेऊन जा रे बडग्या…; नागपुरात आज ऐतिहासिक मारबत-बडग्या महोत्सवमुंबईला जाणारच
मुंबईला नक्की जाणार; पण कधी निघणार, ती तारीख उद्या, शनिवारी (१२ तारखेला) जाहीर करू. सगळ्यांच्या इच्छेवर उपोषण आहे. सरकार जाणूनबुजून गुन्हे दाखल करणार आहे. त्याला आम्ही भिणार नाही. जसे दिवस येतात, तसा संघर्ष करावा लागतो. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
