ठाण्यातील रखडलेल्या ‘झोपू’ प्रकल्पांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षातील नेत्यावर टीकास्त्र सोडलं. तसेच विकासकांच्या आडमुठेपणामुळे रखडलेले प्रकल्प तातडीने मार्गी लावा, सक्षम विकासकांकडे प्रकल्प द्या, असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांमधील विकासकांवरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली. सरनाईक यांच्या ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या तब्बल 11 प्रकल्पांचा सविस्तर आढावा खेवरा सर्कल येथील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात त्यांनी घेतला. यावेळी संबंधित प्रकल्प रखडवणाऱ्या विविध विकासकांकडून काढून सक्षम विकासकांकडे देण्याची स्पष्ट भूमिका सरनाईक यांनी मांडली.
ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प मागील 18 ते 20 वर्षांपासून रखडलेले असून, विकासकांकडून सातत्याने होत असलेल्या दिरंगाईमुळे झोपडपट्टीवासीयांना अद्याप त्यांच्या हक्काच्या घरांचा लाभ मिळालेला नाही. तर अनेक प्रकल्पातील रहिवाशांना वेळेवर भाडे मिळत नसल्याने सर्वसामान्य हवालदिल आहेत. त्यामुळे विकासकांची मनमानी आणि आडमुठी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मंत्री सरनाईक यांनी बैठकीत मांडली.
Mumbai Local : मुंब्रा-दिवा वळणावर महिला थेट लोकल ट्रेनमधून खाली पडली, घटना कॅमेऱ्यात कैद“ज्या विकासकांना प्रकल्प पूर्ण करण्यात स्वारस्य नाही किंवा जे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडवत आहेत, अशा विकासकांकडून प्रकल्प काढून घेऊन ते सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम विकासकांकडे सोपविण्याची कार्यवाही करावी,” असे निर्देश सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सरनाईकांचा शिवसेना पक्षातील नेत्यांना घरचा आहेर
शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेल्या संजय पांडे यांच्या सुभाषनगर आणि गांधीनगर येथील प्रकल्पांवरूनचा सरनाईक यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. विकासकाच्या आर्थिक फायद्यासाठी प्रकल्प मंजूर केले जातात. यामध्ये संजय पांडे असेल अथवा इतर कोणीही त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा पवित्रा सरनाईक यांनी घेतला. तसेच पक्षाच्या आडून कोणीही व्यावसायिक हित साधत असेल, तर ते चुकीचे असून सर्वसामान्य गोरगरिबांच्या हित महत्वाचे असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले.
Eknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदे यांचं अस्खलित इंग्रजीत भाषण, नेमकं काय म्हणाले?
‘क्लस्टर’ प्रकल्प राबवण्याची भूमिका
गांधीनगर, हरदास नगर, चिरागनगर, लक्ष्मी – चिरागनगर, माजिवडा, शास्त्रीनगर अशा प्रकल्पांचा सरनाईक यांनी आढावा घेतला. यातील काही प्रकल्प शिवसेना नेत्यांचे असले तरीही त्यात हयगय करणे चुकीचे असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकारचा एकच भाग आहोत. गोरगरिबांना घर मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यामध्ये काही दलाली मंडळीनी प्रकल्पच विकले असून ते चुकीचे आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या खात्याअंतर्गत क्लस्टर प्रकल्प राबवण्याची भूमिका सरनाईक यांनी स्पष्ट केली. तसेच सुभाष नगरमध्ये गेल्या 20 वर्षांपासून नागरिकांना घर मिळाले नसल्याची बाब त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा