Manoj Jarange Patil Maratha Reservation Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भवन (ता. सिल्लोड) येथे छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कुटुंबांना दिलासा मिळण्याची आशा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीझालेल्या आंदोलनात अनेकांनी प्राण गमावले. त्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि आधार देण्याचा मुद्दा आंदोलनाच्या काळापासूनच चर्चेत आहे. आता संबंधित कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याच्या निर्णयामुळे या कुटुंबांना दिलासा मिळण्याची आशा आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, डॉ. पी. एन. अनबलगन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.
Mira Bhayandar News : पर्युषण पर्वात डब्यात कांदा-लसूण नको, मिरा रोडमधील भाजप नेत्याच्या शाळेचा विद्यार्थ्यांसाठी फतवा, मनसेचा कडाडून विरोध
दरम्यान, ‘आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना आधार देण्याची जबाबदारी महायुती सरकार ठामपणे पार पाडत आहे,’ असे सामंत म्हणाले. या निर्णयातून मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदानाची दखल सरकारने घेतल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे.
‘सरकारला देणेघेण नाही’
‘मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु असलेली बैठक निष्फळ आहे. फक्त षडयंत्र सुरु आहे. हा राजकीय स्टंट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाबाबत काहीही देणेघेण नाही’, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी अंतरवाली सराटीत व्यक्त केली. दरम्यान, वैद्यकीय पथकाने जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केली. ‘ते सलाइन लावून घेत आहेत’, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली.
Amey Ghole : अन्यथा आम्ही सत्तेतून बाहेर पडू, शिवसेना नेत्याचा भाजपला इशारा; शिंदेंनी सुरु केलेल्या योजनेत घोटाळ्याचे आरोप
‘जरांगे यांनी उपोषण सोडावे’
‘प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चार नाही, तर चार हजार पावले पुढे आलो आहोत. आता मनोज जरांगे पाटील यांनी गैरसमज दूर करून उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केले. याच पत्रकार परिषदेत त्यांनी जात पडताळणीच्या संथ गतीबाबतचे दावे फेटाळले.
‘मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जसे पाठीराखे आहेत, तसे आम्ही आमच्या नेत्यांचे पाठीराखे आहोत. जर जरांगे यांच्या विरोधात बोलल्यावर त्यांच्या समर्थकांना राग येत असेल, तर आम्हालाही आमच्या नेत्यांबद्दल एकेरी बोलल्यावर वाईट वाटते’, असे सामंत व लाड यांनी नमूद केले. ‘अधिकारी प्रमाणपत्र देण्याबाबत आणि पडताळणीबाबत योग्य काम करीत आहेत. त्यामुळे जरांगे यांचा कोणी गैरसमज करून देत असेल, तर तसा गैरसमज निर्माण करून देणारी व्यवस्था त्यांनी दूर करावी’, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
Someshwar Sugar factory: पुन्हा पवार विरुद्ध पवार; ‘सोमेश्वर’साठी सुनेत्रा पवारांच्या पॅनेलसमोर युगेंद्र पवारांचे आव्हान
कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप वेगाने
आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३,१७,५६९ अर्जांपैकी ३,१६,९७७ जणांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे, तसेच जात पडताळीसाठी प्राप्त २१,०५१ पैकी १६, ११० प्रकरणांमध्ये प्राप्त जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
