• Thu. Sep 10th, 2026

Satara Student Srushti Biramane Death Case : बाथरुमच्या भिंतीवर रेक्टरबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे समोर आले होते. त्यामुळे रेक्टरने केलेल्या तक्रारीनंतर दोन विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून घेतले गेले. परंतु सृष्टीने हॉस्टेलमध्येच आयुष्याची अखेर केली

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सातारा : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन १९ वर्षीय विद्यार्थिनी सृष्टी भानुदास बिरामणे हिने आयुष्य संपवल्याची घटना २ सप्टेंबर रोजी समोर आली होती. त्यानंतर सृष्टीला जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉस्टेलच्या रेक्टरला अटक करण्यात आली आहे. तर महाविद्यालयीन प्राचार्य आणि समुपदेशन समितीच्या सदस्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

रेक्टरला अटक

‘फूड टेक्नॉलॉजी’च्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या सृष्टी बिरामणे हिचा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तीन मजली वसतिगृहावरुन खाली उडी मारल्याने मृत्यू झाला. तीन दिवसांनंतर, ५ सप्टेंबर रोजी तिचे वडील भानुदास बिरामणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि वसतिगृह अधीक्षिका जयश्री जाकते यांना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, रेक्टर, प्राचार्य आणि समुपदेशन समितीच्या सदस्यांवर ‘भारतीय न्याय संहिते’नुसार जीव देण्यास प्रवृत्त करण्याशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra TimesSarkhej Murder Case : मित्रासोबत व्हिडिओ व्हायरल झाल्याचा राग, पिता-पुत्राने लेकीला संपवलं, निर्जन जागी अपघाताचा बनाव, एका क्लूने पितळ उघडं“आम्ही रेक्टरला अटक केली आहे. प्राचार्य आणि समुपदेशन समितीच्या सदस्यांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत” असे सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, रेक्टरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. इतर आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

हॉस्टेलमधील वाद

एफआयआरनुसार, वसतिगृहातील अस्वच्छता, परिसराची दुर्दशा आणि मेसच्या सुविधांशी संबंधित तक्रारींवरुन हा वाद निर्माण झाला होता. हॉस्टेलमधील परिस्थितीमुळे काही विद्यार्थिनी नाराज होत्या आणि नंतर बाथरुमच्या भिंतीवर रेक्टरबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे समोर आले होते.

रेक्टरने महाविद्यालयाच्या समुपदेशन समितीकडे तक्रार केली होती; त्यानंतर समितीने गैरवर्तनाचा आरोप असलेल्या दोन विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून घेतले होते.

Maharashtra TimesRohan Parekh : रोहन पारेख PMO मध्ये जॉब लागल्याचं समजून काम करत होता; मोदींच्या BKC तील कार्यक्रमाआधी सुरक्षाभेद, वकिलांच्या दाव्यामुळे ट्विस्ट

विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावलं

आपल्या तक्रारीत बिरामणे यांनी आरोप केला की, त्यांच्या मुलीने त्यांना या घडामोडींबद्दल आणि वसतिगृहातील काही विद्यार्थिनींवर निर्माण झालेल्या दबावाबद्दल माहिती दिली होती. गैरवर्तनाचा आरोप असलेल्या दोन मुली उडी मारण्याच्या उद्देशाने वसतिगृहाच्या गच्चीवर धावल्या होत्या, परंतु त्यातील एका मुलीला इतर विद्यार्थिनींनी रोखले होते.

वडिलांनी आरोप केला की, रेक्टरने सृष्टीला धमकावले आणि तिच्यावर दबाव टाकला; तसेच तिला वसतिगृहातून काढून टाकण्याची धमकीही दिली. त्यांनी असाही दावा केला की, महाविद्यालयीन प्राचार्यांनी हस्तक्षेप केला नाही आणि समुपदेशन समितीने अशा परिस्थितीत अपेक्षित असलेला आधार किंवा मार्गदर्शन दिले नाही.

Maharashtra TimesKanpur Murder Case : जुन्या नोकराशी चॅटिंग, 49 व्हॉट्सअप मेसेज डिलीट, 309 वेळा कॉल; कोट्यधीश सासऱ्याच्या मारेकरी सुनेचे कारनामे समोरबिरामणे यांनी असाही आरोप केला की, विद्यार्थिनींवर कारवाई सुरू करण्यात आली असली तरी, आक्षेपार्ह मजकूर नेमका कोणी लिहिला होता हे शोधण्यासाठी कोणतीही योग्य चौकशी करण्यात आली नाही. मृत्यूपूर्वी सृष्टीने इंग्रजी भाषेत एक छोटी चिठ्ठी लिहिली होती. आता पोलीस तपासाचा भाग म्हणून या आरोपांची, वसतिगृहाच्या नोंदींची आणि विद्यार्थिनींच्या जबाबांची पडताळणी करत आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा