योगेश काकफळे, जालना: अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आज दहाव्या दिवशीही सुरू आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत अनेक गंभीर सवाल उपस्थित केले. याच पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूबाबतही शंका व्यक्त करत या घटनेच्या तपासाबाबत शंका व्यक्त केली.
अजित पवार यांच्या निधनाचा उल्लेख करताना जरांगे पाटील भावुक झाले. “अजितदादांचं कोणासोबत शत्रुत्व नव्हतं. एवढा मोठा माणूस असा मरत असतो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे आणि अभ्यासू नेतृत्व होते. त्यांनी राज्यासाठी आणि देशासाठी दिवसरात्र काम केले. त्यामुळे अशा नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होणे ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर तपास यंत्रणांकडून विविध पातळ्यांवर तपास करण्यात येत आहे. विमानाच्या तांत्रिक स्थितीपासून ते उड्डाणाच्या परिस्थितीपर्यंत विविध बाबी तपासाचा भाग आहेत. विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती, फ्लाइट डेटा आणि कॉकपिटमधील संभाषण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणे अपेक्षित आहे. मात्र, अजितदादांच्या मृत्यूबाबतची संपूर्ण आणि अंतिम माहिती जनतेसमोर स्पष्टपणे यायला हवी, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. कोणत्याही व्यक्तीवर थेट आरोप करण्यापेक्षा या घटनेचा तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा
पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असताना सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. सरकारकडून केवळ आश्वासने, बैठका आणि चर्चांच्या माध्यमातून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाज आता सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही; निर्णय हवा आणि त्याची अंमलबजावणी हवी, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
यापुढे मराठा समाज गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी मुंबई गाठण्याचा इशारा दिला. सरकारने आंदोलनाची ताकद कमी लेखू नये. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आपली मागणी मांडत आहे, मात्र मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले तर आंदोलनाची दिशा आणि व्याप्ती आणखी मोठी होईल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.
दरम्यान, एकीकडे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आमरण उपोषण दहाव्या दिवसात पोहोचले आहे, तर दुसरीकडे अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता सरकार आणि तपास यंत्रणा या प्रश्नांवर काय भूमिका मांडतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा