मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील आरक्षणावरून मतभेद होताना सातत्याने दिसतात. त्यातच पुन्हा एकदा मुंबई गाठणार असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. यावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जरांगेंना सांगून सांगून सगळे सांगून दमले, आता यावर यंत्रणा लक्ष देईल, असे भुजबळ म्हणाले. तसंच जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यासमोर अर्वाच्य भाषा वापरल्याने भुजबळांनी संताप व्यक्त केला.