पुण्यात डान्सर राधा पाटील हिच्यासह दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक आणि मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : डान्सर राधा पाटील मुंबईकर हिच्यावर पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधा पाटील हिच्यासह दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करणारे मंडळाचे अध्यक्ष भुषण सोनवणे आणि आयोजक अमोल कांटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लावणीच्या नावाने अश्लील डान्स सादर होऊ नये म्हणून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचं प्रमाणपत्र दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी सादर करण्याची अट होती. तसं प्रमाणपत्र सादर न झाल्यास संबंधित मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नव्हती. संबंधित अट मान्य न केल्याने आता पुण्यात दहीहंडी आयोजकांसह मंडळाचे अध्यक्ष आणि डान्सर राधा पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांवर पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.
राज्यभरात नुकताच गोकुळाष्टमी आणि गोपाळकालाचा उत्साह बघायला मिळाला. या सणाच्या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमांना चांगलीच रंगत आलेली बघायला मिळाली. या कार्यक्रमांमध्ये टीव्ही मालिका, सिनेमांमध्ये दिसणारे कलाकार मंडळी मंचावर बघायला मिळाले. अनेक अभिनेत्री, डान्सर या कार्यक्रमांच्या मंचावरुन दहीहंडी फोडणारे गोविंदा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसले. यामध्ये प्रसिद्ध रिल्सस्टारदेखील सहभागी होते. पण या कार्यक्रमांवरुन नेटीझन्सकडून टीकेची झोडदेखील उठताना दिसत आहेत.
एकीकडे सण, उत्सव साजरी होत असताना लावणीच्या नावाने आक्षेपार्ह डान्स स्टेप्सवर अनेकांचा आक्षेप आहे. हे असे प्रकार याच उत्सवात झाले आहेत, असं नाही. तर याआधीदेखील सर्रासपणे अश्लील नृत्य झाल्याचे काही ठिकाणी बघायला मिळाले आहे. अशाप्रकारचे डान्स मोठ्या मंचावरुन होऊ नये, यासाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या. कारण अशा डान्स स्टेप्सवरुन लहान मुलांवर काय संस्कार होतील? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच समाज म्हणून आपली वाटचाल कोणत्या दिशेला यामुळे होते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचं प्रमाणपत्राची अट ठेवण्यात आली होती. पण ही अट पाळली न गेल्यामुळे पुण्यात राधा पाटील हिच्यासह मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Maharashtra Rain : श्रींच्या आगमनाला तुफान पाऊस येणार, 13 ते 17 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
एफआयआरमध्ये काय म्हटलं आहे?
“चालु वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडी उत्सव सन 2026 चे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील उत्सव साजरा करणारे मंडळे स्पिकर, मिरवणुक परवाना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमाच्या अनुषंगाने परवानगी मिळणेकामी अर्ज सादर केले होते. त्याप्रमाणे कात्रजला राहणारे एम्पायर ग्रुप ए. के. बॉइजचे अध्यक्ष भुषण सोनवणे यांनी 06/09/2026 रोजी दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने लावणी नृत्यांगणा/कलाकार राधा पाटील यांचे लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमास परवानगी मिळण्यासाठी त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज सादर केला होता.”
Crime News : दरोडेखोरांनी स्वप्नातही विचार केला नसेल तशा मुसक्या आवळल्या, समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्यांना सिनेस्टाईल बेड्या“त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधीत विषयाबाबत मुंबईतील रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सचिव यांचे रंगभूमी मंडळांची कार्यपद्धती तसेच अनुसरावयाची सर्वसाधारण तत्वे निश्चिती बाबत आणि त्याप्रमाणे मंडळाचे कार्य चालतेबाबत अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर यांचे जा.क्र.अपोआ/प्रशासन/मनोरंजन कार्यक्रम/परवाना/2026 /96 दि. 02/09/2026 अन्वये मा. सचिव, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई यांचे जा.क्र.रंप्रपम/आस्था/2591/2026 दि. 14/08/2026 पत्रातील सुचनांचे पालन करनेबाबत पत्र प्राप्त आहे.”
“सदर पत्रान्वये अर्जदार भुषण सोनवणे यांना सदर लावणी कार्यक्रमाचे अनुषंगाने विहीत नमुन्यामध्ये परवानगीसाठीची कागदपत्रे सादर करणेबाबत कळविण्यात आलेले होते. पण मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या लावणी नृत्यांगणा/कलाकार राधा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्राधिकृत कागदपत्रे/प्रमाणपत्र सादर न केल्याने बिबवेवाडी पो.स्टे. जा.क्र./4427/2026 दि. 06/09/2026 अन्वये सदर कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली होती.”
Satara News : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, आरोपीचा पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर घातपात“तरी भैरवनाथ सोसायटी आंबामाता मंदिर रोड सुखसागरनगर कात्रज पुणे या ठिकाणी यातील अर्जदार आरोपी भुषण सोनवणे, आयोजक अमोल कांटे, राधा पाटील मुंबईकर लावणी कलाकार यांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबई कार्यालयाकडील कोणतेही प्राधिकृत कागदपत्रे/प्रमाणपत्र सादर केली नाहीत. तसेच सदर कार्यक्रमास परवानगी नाकारली असताना कार्यक्रम आयोजित करुन दिलेल्या आदेशाचा भंग करुन लावणी कार्यक्रम आयोजित केला. यामुळे दिलेल्या आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा