• Mon. Sep 7th, 2026

Pune to Konkan Railway 10 Rounds : पुण्यातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता, पुण्यातूनही १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान रेल्वेच्या १० फेऱ्या करण्यात येणार आहेत.

पुणे ते कोकण गणेशोत्सावासाठी रेल्वे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-रत्नागिरी मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-रत्नागिरी आणि रत्नागिरी-पुणेदरम्यान १२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण दहा फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांना लोणावळा, कल्याण, पनवेलसह कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

गाडी क्रमांक ०१४४५ पुणे-रत्नागिरी

गाडी क्रमांक ०१४४५ पुणे-रत्नागिरी विशेष १५ आणि २२ सप्टेंबर रोजी पुणे स्थानकातून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीची ०१४४६ रत्नागिरी-पुणे विशेषत्याच दिवशी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुण्यात दाखल होईल; तसेच ०१४४७ पुणे-रत्नागिरी विशेष १२, १९ आणि २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता पुण्याहून सुटेल आणि सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ०१४४८ रत्नागिरी-पुणे विशेष त्याच दिवशी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरीहून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुण्यात येईल.

Maharashtra TimesPune News : ‘डीजे’विरोधात ध्वनिवर्धन! पुण्यातील मोर्चात बंदीची मागणी, राजकीय नेत्यांचाही समर्थनाचा सूर, पण मोर्चाला विद्यानंद बापट अनुपस्थित; कारण काय?

१५ स्थानकांवर थांबे

या विशेष गाड्यांना येता-जाता चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. विशेष गाड्यांसाठी नियमानुसार विशेष शुल्क लागू राहणार आहे.

आधी मेट्रो सुरू करा; नंतर श्रेय लाटा

‘हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन गेल्यावर्षीच होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याचे कारण पुढे करून कामे रखडवली जात आहेत. मेट्रो सुरू करण्यासाठी आता फीत कापण्याची गरज नाही. आधी मेट्रो थेट सुरू करा, त्यानंतर हवे तेवढे मोठे होर्डिंग लावून खुशाल श्रेय लाटत राहा,’ अशा शब्दांत माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

Maharashtra TimesSatara News : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, आरोपीचा पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर घातपात
हिंजवडीतील अपुऱ्या नागरी सुविधांविरोधात आयटी अभियंते आणि स्थानिक नागरिकांनी काढलेल्या मोर्चात ठाकरे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मेट्रोचे रखडलेले काम, रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीवरून सरकारला लक्ष्य केले. मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.

‘जिथे उद्योग आणि ‘आयटी’चे वैभव दिसायला हवे, तिथे रस्त्यांवर कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे. मुख्यमंत्र्यांनी इच्छाशक्ती दाखवली; तर ही कामे एका आठवड्यात मार्गी लागू शकतात,’ असा दावा ठाकरे यांनी केला.

Maharashtra TimesSatara News: साताऱ्यातील १९ वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण; हॉस्टेलमध्ये नेमकं काय घडलेलं? वडिलांनी सांगितलं

मुख्यमंत्र्‍यांनी भेट न घेतल्याचा आरोप

‘मुख्यमंत्री हिंजवडीच्या अगदी जवळ येऊन गेले; मात्र त्यांनी वेळ काढून ‘आयटी’ क्षेत्रातील त्रस्त कर्मचाऱ्यांची भेट घेतली नाही. महाराष्ट्रातील जनता ‘जीएसटी’च्या रुपाने केंद्राला भरघोस कर देते. त्याचा परतावा राज्याला किती मिळतो, याचे उत्तर सरकारने द्यावे. पुणेकरांचे हाल थांबवण्यासाठी हिंजवडी मेट्रो तातडीने सुरु करणे हीच काळाची गरज आहे’, असेही ठाकरे म्हणाले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा