Mohan Bhagwat : आंदोलन म्हणजे संवादच! आंदोलकांना देशविरोधी न मानण्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
‘लोकशाहीत आंदोलन हा संघर्षाचा नव्हे, तर संवादाचा मार्ग आहे. आंदोलनातून सहमती निर्माण झाली पाहिजे; केवळ वादविवाद होऊन उपयोग नाही. आजची तरुणाई व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आवाज उठवत आहे. त्यांच्या तक्रारी खऱ्या आहेत. त्यांना देशविरोधी न मानता, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’, असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी दिला.