• Sat. Jun 6th, 2026
    Maharashtra Rain Update : कुठे पाऊस तर कुठे गारपीट; राज्यात 30-31 मार्चला वादळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

    महाराष्ट्रात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता असून, शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    महाराष्ट्रात ३० आणि ३१ मार्चला पावसाचा इशारा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : राज्यातील हवामानात सध्या लक्षणीय बदल दिसून येत असून येत्या 30 आणि 31 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः दुपारनंतर आभाळ दाटून येत हलका ते अतिदमदार स्वरूपाचा पाऊस, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    30 मार्च

    सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे आणि ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. कर्नाटक आणि तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये या बदलाचा अधिक प्रभाव जाणवू शकतो. 30 मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याचबरोबर वादळी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून विजांचा कडकडाटही होऊ शकतो.

    31 मार्च

    31 मार्च रोजीदेखील राज्याच्या काही भागांमध्ये या अस्थिर हवामानाचा परिणाम कायम राहण्याचा अंदाज आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

    Maharashtra TimesSushma Andhare : अशोक खरातसोबतचे हेमंत गोडसे, अतुल सावेंचे फोटो दाखवत सुषमा अंधारे संतापल्या; दीपक केसरकरांच्या एसआयटी चौकशीची केली मागणी

    शेतकऱ्यांनी सतर्क राहावे

    दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांची काढणी सध्या सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे काढणी केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत, तसेच झाकण्यासाठी ताडपत्री किंवा इतर उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

    तसेच वादळी वाऱ्यांपासून आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. हवामानातील बदल लक्षात घेता पुढील काही दिवस हवामानाचा अद्ययावत अंदाज नियमितपणे तपासून शेतीची कामे नियोजनबद्ध करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. एकूणच, राज्यातील हवामान पुढील दोन दिवस अस्थिर राहण्याची शक्यता असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा