आमदार राजेश क्षीरसागरांनी राजू शेट्टींच्या नावे ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केलेलाक्षीरसागरांच्या आरोपानंतर राजू शेट्टी बिंदू चौकात सातबारा घेऊन हजर झाल्याचे दिसले. निवडणुका आल्यावर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर आरोप केले जातात, असे शेट्टी म्हणाले.कथित ५०० एकर जमिनीचे सातबारे क्षीरसागरांनी दाखवावे, असे आव्हान शेट्टींनी दिले.शेट्टींवरील आरोप खरे असले तर आमचेही सातबारे देऊ असं म्हणत काही शेतकरीही दाखल झाले.