Nagpur Crime News : कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन एका २३ वर्षीय विवाहित महिलेने शनिवारी दुपारी उडी मारून आयुष्य संपवलं. महिला पतीसोबत निर्माल्य टाकण्यासाठी आली होती. त्यावेळी महिलेने अचानक टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी गेले आणि महिलेचं धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास साकोरे दाम्पत्य कारमधून काचूरवाही गावाकडे जात होते. त्यावेळी नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीच्या नेरी पुलावर थांबले. दोघांनी गाडी थांबवून काही वेळ त्या पुलावर घालवला. या दरम्यान दोघांनी मोबाईलवर सेल्फी देखील काढला. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेलं निर्माल्य नदीत टाकण्यास सुरुवात केली. मात्र, निर्माल्य टाकतानाच ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी मारली. हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना जबर धक्का बसला. त्यांनी आरडाओरडा केली. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालं.
Jalgaon News : सगळे गाढ झोपलेले, अचानक बस पुलावरुन थेट नदीत कोसळली, जळगावात मोठा अनर्थ टळला
कौटुंबिक वाद कारण असल्याची प्राथमिक माहिती
पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र, सायंकाळ होताच अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवावं लागलं. रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं. दरम्यान, या धक्कादायक घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पती – पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी विजय साकोरे याचाही जबाब नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.
नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घर पालिकेडून जमीनदोस्त
स्थानिक नागरिक आणि पुलावरुन जाणाऱ्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. शनिवारी दिवसभरात अनेकजण घटनास्थळावर गर्दी करत होते. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू असून, पुलावर काढलेली दाम्पत्याचा सेल्फी हा घटनेतील अत्यंत वेदनादायक पैलू ठरत आहे. पोलिसांनी नागरिकांना अपप्रचार न करण्याचं आवाहन केलं आहे.
