Raju Shetty On Farmers Loan Waiver: अस्मानी-सुल्तानी संकटांनी शेतकरी जेरीस आला असताना शासनाची धोरणे ही शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे रविवारी (दि.२०) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अस्मानी-सुल्तानी संकटांनी शेतकरी जेरीस आला असताना शासनाची धोरणे ही शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. ‘जिल्ह्यातील नेत्यांमुळे बँक डबघाईस’ ‘पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना तब्बल २ हजार रुपयांची हमी दिली जाते, पण लाखो शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंक वाचविण्यासाठी रुपयाही दिला जात नाही, ही विषमता नाही तर काय आहे? ही बॅंक जिल्ह्यातील नेत्यांनीच डबघाईस आणली. केवळ कुणी ५ लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवून ही बॅंक वाचणार आहे का?’ असे विचारत त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली. शेट्टी म्हणाले की, ‘कर्जदार शेतकऱ्यांची वसुली केली जाते तेव्हा त्यांची संपत्ती लिलावात निघते. आम्हालाही जिल्हा बँकेसाठी वसुलीचे अधिकार द्या, कृषिमंत्र्यांची संपत्तीही आम्ही लिलावात काढतो की नाही ते बघा.’
Sanjay Nirupam: दोन शून्य एकत्र केले तरी बेरीज शून्यच; संजय निरुपम यांची ठाकरे बंधूंच्या मनोमिलन चर्चेवर सडकून टीका
‘कांद्याला १५०० रुपये हमीभाव द्या’
कांदा उत्पादकांचा प्रश्न गंभीर आहे. कांद्याचे निर्यातशुल्क हटविण्याचे शहाणपण सरकारला उशिराने सुचले. योग्यवेळी कांदा निर्यातशुल्क रद्द न केल्याने कांद्याच्या भावात घसरण झाली. ही जबाबदारी सरकारचीच आहे. कांदाप्रश्नी आम्ही मंत्रालयात कांद नेऊन आंदोलन केले होते. तुरुंगात गेलो पण सरकारला उशिराने शहाणपण सुचले. सरकारने कांद्याला १५०० रुपये हमीभाव द्यावा. आमचा नाफेडवर भरवसा नाही, असेही ते म्हणाले. परभणी जिल्ह्यात दीड लाख रुपयांच्या कर्जामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली. त्याचरात्री त्या शेतकऱ्याच्या गरोदर पत्नीने आत्महत्या केली. तरीही सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकत नाही. ही परिस्थिती मन विषण्ण करणारी आहे, असे ते म्हणाले.
मुंबई २६/११ हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; भाजपचे माधव भांडारींचा खळबळजनक दावा
राजू शेट्टी म्हणाले…
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर कोट्यवधी खर्च
- सुनील तटकरे यांच्या घरी एक वाटी आमरस अन् एक मोदक खाण्यासाठी तब्बल दीड कोटी खर्च
- कोट्यवधी रुपये खर्च करणारे शेतकऱ्यांसाठी एक रुपयाही देत नाही
- सरकारला याची लाजही वाटायला हवी

