• Fri. Mar 13th, 2026
    भरधाव ट्रकने पाच वाहनांना उडवलं, खंडाळा बोर घाटात बाप – लेकीवर काळाचा घाला; परिसरात हळहळ

    Khandala Bhor Ghat Accident : खंडाळा बोर घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात बाप – लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रशांत श्रीमंदिलकर, लोणावळा, पुणे : खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने एका बाप – लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री हा अपघात झाला आहे.

    ट्रकची धडक, कारमधील बाप – लेकीचा दुर्दैवी मृत्यू

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रक खंडाळा घाटातील तीव्र उतारावरून अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या पाच वाहनांना धडकला. यात एका कारमधील बाप आणि त्याच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
    Nalasopara Crime : आई-वडील कामावर, घरात असं काय घडलं, की….तेरा वर्षाच्या भावाने सात वर्षाच्या लहान बहिणीला संपवलं; कारण हैराण करणारं

    ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार

    ट्रक पाच वाहनांना धडकल्याच्या घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलीस, बोरघाट वाहतूक पोलीस आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्यात आली. ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
    Pune News : कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

    वाढत्या अपघातांवर कठोर उपाययोजनांची गरज

    या अपघातामुळे खंडाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बाप – लेकीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली असून, प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाढत्या अपघातांमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

    Pune News : भरधाव ट्रकने पाच वाहनांना उडवलं, खंडाळा बोर घाटात बाप – लेकीवर काळाचा घाला; परिसरात हळहळ

    प्राथमिक तपासात ट्रक चालकाचा वेग आणि निष्काळजीपणा हे अपघाताचं कारण असल्याचं समोर आलं आहे. खंडाळा घाटातील तीव्र उतार आणि वळणं यामुळे येथे अपघातांचं प्रमाण अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, वाहनांच्या वेगावर नियंत्रण, रस्त्याची देखभाल आणि चालकांना प्रशिक्षण देणं आवश्यक आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed